भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली मध्ये सोरू होईल. भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेतून संघात पुनरागमन करणार होता, पण आता हे पुनरागमन अधिकच लांबताना दिसत आहे. वृत्तांनुसार मोहम्मद शमी या मालिकेत देखील खेळू शकणार नाहीये. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली, असेही सांगितले गेले आहे.
शमीला आगामी टी-20 टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघातून बाहेर राखील खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायच्या आहेत. मोहम्मद शमी (Mohammad Shami) टी-20 विश्वचषकात जरी राखीव खेळाडूंमध्ये असला, तरी या दोन संघांविरुद्ध मात्र त्याला प्रमुख संघात निवडले गेले आहे.
क्रिकबज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शमीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि याच कारणास्तव तो मोहालीमध्ये पोहोचू शकला नाहीये. याठिकाणी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची पूर्वतयारी करण्यासाठी भारतीय संघ आणि व्यवस्थापन 17 सप्टेंबर म्हणजेच शनिवारी मोहालीमध्ये दाखल झाला आहे.
दरम्यान, शमीने त्याचा शेवटचा टी-20 सामना नामिबियाविरुद्ध 8 नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकातील हा सामना होता. त्यानंतर तब्बल 10 महिने शमी टी-20 फॉरमॅटमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. असे सांगितले गेले होते की, निवडकर्त्ये टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावाचा विचार करणार नव्हते. परंतु, आशिया चषकात संघाची झालेली वाताहात पाहून त्याला पुन्हा एकदा टी-20 संघात संधी दिली गेली. आशिया चषकात भारताचे दोन प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे खेळले नाहीत. तसेच युवा गोलंदाजांनाही अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केविन ओब्रायनच्या शतकापुढे नर्सचे शतक फिके! गुजरातचा इंडिया कॅपिटल्सवर रोमांचक विजय
‘अरे तो खराब फॉर्ममध्ये कधी नसतोच!’, केकेआरच्या दिग्गजाने केले रोहित शर्माचे कौतुक
LLC 2022: ईडन गार्डन्सवर ऍश्ले नर्सचे वादळ! गुजरातच्या गोलंदाजांचा घामटा काढत ठोकले नाबाद शतक