गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशात क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव कमी होताना दिसत असल्यामुळे जगभरातील क्रिकेट बोर्ड पुन्हा क्रिकेटची सुरुवात करण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र, या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
असे असले तरी, शेवटचा निर्णय हा येत्या २८ मेला होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. पण, अशी आशा आहे की, या बैठकीमध्ये टी२० विश्वचषकाला २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो आणि ऑस्ट्रेलियादेखील या निर्णयाचे समर्थन करण्याची शक्यता आहे.
आयसीसीच्या एका सुत्राकडून देण्यात आलेल्या वृत्तात असे लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियामधील टी२० विश्वचषक हे फेब्रुवारी २०२१पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते. यामुळे इंग्लंडमध्ये जुलै २०२१ला होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावरही परिणाम होऊ शकतो. त्या सामन्याला ४ महिने पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. Reports suggest india can host 2 icc world cup in gap of 4 months after corona virus.
विशेष म्हणजे, टी२० विश्वचषक २०२१पर्यंत ढकलण्यात येण्याचे जवळपास ठरलेले आहे. असे झाल्यास, भारतात २०२१मध्ये आयोजित केले जाणारी टी२० विश्वचषक स्पर्धा ही २०२२मध्ये होईल आणि फेब्रुवारी २०२३ मधील वनडे विश्वचषकाचे आयोजनही भारतात केले जाईल. अशाप्रकारे, भारताला ४ महिन्यांच्या आत २ विश्वचषकांचे आयोजन करावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११
भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिकलेला क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात केला…
ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम