भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट जगतातील दोन आघाडीचे संघ आहे. या संघात नेहमीच अटीतटीचे सामने पाहायला मिळतात. मात्र, काही भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले आहे.
या लेखात आपण अशा तीन भारतीय फलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत.
3. रोहित शर्मा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय सलामीवीर रोहित शर्मा हा नेहमीच जबरदस्त कामगिरी करतो. सन 2013 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात 209 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित 40 वनडे सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 61 पेक्षा जास्त सरासरीने 2208 धावा केल्या आहे. याव्यतिरिक्त रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत.
2. विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटविश्वात रन मशीन म्हणून ओळखला जातो. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात यशस्वी ठरला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 वनडे सामने खेळले आहे. 54.57 च्या सरासरीने 1910 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतके आणि 8 अर्धशतके ठोकली आहेत.
1. सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या बऱ्याच सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. त्याच्या आवडत्या विरोधी संघांपैकी एक संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. या संघाविरुद्ध सचिनने 71 सामन्यांत 44.59 च्या सरासरीने 3077 धावा केल्या आहेत. त्याने 9 शतके आणि 15 अर्धशतके ठोकली आहेत.
ट्रेंडिंग लेख-
किती हे दुर्देव! उत्कृष्ट कामगिरी करूनही टीम इंडियात स्थान टिकवू न शकलेले ३ भारतीय खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘विराट’सेना नेहमीच ठरली वरचढ, पाहा आकडेवारी
सातत्याला सलाम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरीने धावा करणारे ३ भारतीय धडाकेबाज फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश