भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्याने आशिया चषक 2022 मधून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत त्याने शेवटचे दोन सामने खेळले होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याने माघार घेतली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बुमराह आगामी टी-20 विश्वचषकात देखील खेळू शकणार नाहीये. अशात आपण या लेखात अशा तीन खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे टी-20 विश्वचषकात भारतासाठी बुमराहची कमी भरून काढू शकतात.
3. उमरान मलिक –
मुळचा जम्मू कश्मीचरा असणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याला आयपीएल 2022 मधील दमदार प्रदर्शनानंतर भारतीय संघासाठी पदार्पण केले. परंतु काही सामन्यांमध्ये संधी दिल्यानंतर त्याला बाहेर ठेवले गेले आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी टी-20 विश्वचषकात खेळत नसताना उमरान नक्कीच संघातील त्याची जागा घेऊ शकतो. त्याच्याकडे बुमराहसारखा अनुभव नाहीये, पण गती नक्कीच आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. असात उमरान संधी मिळाली तर संघासाठी एक्स फॅक्टर देखील ठरू शकतो.
2. दीपक चाहर –
दीपक चाहर (Deepak Chahar) त्या चार खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांना टी-20 विश्वचषकाच्या संघात राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. बुमराहने माघार घेतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चाहर एक चांगला पर्यात असेल. तो चांगली गोलंदाजी तर करतोच, पण फलंदाजीतही महत्वाचे योगदान देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने चार षटकांमध्ये 24 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. पावरप्लेमध्ये त्याने या विकेट्स घेतल्यामुळे आफ्रिकी संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. परिणामी भारताचा विजय सोपा झाला. त्याच्या टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर आतापर्यंत खेळलेल्या 22 सामन्यांमध्ये त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 22.53 च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि 8.08 ही त्याची इकोनॉमी राहिली आहे.
1. मोहम्मद शमी –
दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) संघातील बुमराहची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याने टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारतासाठी एकही टी-20 सामना खेळला नाहीये. मागच्या वर्षी आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म चांगला दिसला होता. त्याने या हंगामात 16 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या होत्या. त्याला टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघात निवडले जण्याची सर्वांनाच अपेक्षा होती, पण निवडकर्त्यांनी त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले. शमीली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत निवडले गेले होते, पण दुर्दैवाने त्याला कोरोनाची लागण झाली आणि या मालिकांमध्ये तो खेळू शकला नाही. आता तो कोरोनातून पूर्णपणे सावरला असून चाहते त्यच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. आफ्रिकी संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातूनच तो पूनरागमन करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 विश्वचषकात माझी गोलंदाजी खेळूनच दाखवा’, पाकिस्तानी गोलंदाजाचे भारताला ओपन चॅलेंज
ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना