भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुखापतीच्या कारणास्तव त्याला हा निर्णय घ्यायला लागला, अशी माहिती समोर आली आहे. बुमराहविषयी या बातम्या समोर येताच ट्वीटवर चर्चांना उधान आले आहे. बुमराहने माघार घेतल्यानंतर भारतीय संघ कमजोर पडणार असल्यामुळे, त्याचा बदली खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशात आता भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांची नावे ट्वीटरवर ट्रेंट करू लागली आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी-20 विश्वचषक खेळणार नाही, ही बातमी समोर आल्यानंतर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोघांची चर्चा सुरू झाली आहे. ट्वीटरवर या दोघांची नावे चर्चेत आहेत. काही चाहते सिराजला संघात पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे अनेकांच्या मते मोहम्मद शमी बुमराहचा योग्य पर्यायी खेळाडू ठरले. वृत्तसंस्था पीटीआयने बुमराह टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. असे असले तरी, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कसलीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये. अशात आता टी-20 विश्वचषकात बुमराहची जागा कोण करून काठणार, हे पाहावे लागेल.
मोहम्मद सिराजची टी-20 आंतरराष्ट्रीयमधील आकडेवारी –
मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने निराशाजनक प्रदर्शन केले होते. परंतु यावर्षी टी-20 विश्वचषकात संघा चांगले प्रदर्शन करण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. अशात बुमराहच्या बदली खेळाडूच्या रूपात देखील संघ एखाद्या अनुभवी खेळाडूंलाच संधी देऊ इच्छित असेल. सिराजच्या टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी 5 सामने खेळले आणि 5 विकेट्स घेतल्या. परंतु यादरम्यान ताचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त होता, जो खूपच जास्त आहे. आकडेवारी जरी समाधानकारण नसली, तरी सिराज त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतासाठी महत्वाची भूमिका नक्कीच पार पाडू शकतो.
मोहम्मद शमीची टी-20 आंतरराष्ट्रीयमधील आकडेवारी –
मोहम्मद शमी भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज असला, तरी त्याला टी-20 क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 2014 साली भारतासाठी टी-20 पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याने भारतासाठी पहिला टी-20 सामना विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. आजपर्यंत त्याला एकूण 17 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे आणि यामध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, शमीला टी-20 विश्चचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात संधी मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु निवडकर्त्यांनी त्याला मुख्य संघात सामील न करता राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे. आता बुमराह या संघातून बाहेर झाल्यानंतर त्याला संधी मिळेल अशी पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ठरलं तर! 7 ऑक्टोबरला पुन्हा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे आणि कधी खेळणार संघ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलची स्लो खेळी ठरली ऐतिहासिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय