क्रिकेटला अनिश्चितेचा खेळ म्हटलं जातं. इथे एक चेंडू, एक धाव किंवा एका झेलमुळे पूर्ण सामना पालटू शकतो. या खेळाप्रमाने कोणत्या क्रिकेट संघातही अचानक बदल पाहायला मिळत असतात. सध्या असेच बदलाचे वारे वाहते आहे, भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team). या महिन्याच्या अंती भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) करण्यासाठी जाणार आहे. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आलेत.
गेल्या महिन्यात झालेल्या टी२० विश्वचषकानंतर, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर याच कोहलीला बीसीसीआयने मोठा धक्का देत, त्याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्वपदही काढून घेतले. वनडे संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) ला कर्णधारपदी बढती देण्यात आली आहे.
‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितची वनडेतील कामगिरी सर्वांना परिचित आहे. तो वनडेत ३ द्विशतके ठोकणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. असे एकाहून एक दमदार विक्रम करणारा रोहित नेतृत्त्वातही हिटच राहिला आहे. आता कोहलीनंतर वनडे संघाच्या कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पडल्यामुळे तो या स्वरुपातील यशस्वी कर्णधार बनण्यावर जोर देईल. या लेखात आपण रोहित वनडे क्रिकेटमध्ये चांगला कर्णधार बनण्यामागची कारणे पाहणार आहोत. (Reasons Of Rohit Sharma Can Be
१- नेतृत्त्वाचा दांडगा अनुभव
रोहित गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारताच्या वनडे अन् टी२० संघाचा उपकर्णधार राहिला आहे. त्यामुळे तो भारताच्या नेतृत्व गटातला महत्त्वाचा भागही राहिला आहे. विराटच्या गैरहजेरीत बऱ्याचदा त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. आशिया चषक, निदाहास ट्रॉफी, अशा महत्त्वाच्या मालिकांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
रोहितन आतापर्यंत ३२ सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केले आहे. त्यापैकी २३ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे, तर फक्त ६ सामन्यांत भारताला पराभव पत्कारावा लागला आहे. यातील १० सामने वनडेचे आहेत. या १० पैकी फक्त २ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे.
इतकंच नाही तर, आयपीएल या टी२० लीगचाही तो सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला आधीपासूनच नेतृत्त्वाचा दांडगा अनुभव आहे, असं म्हणता येईल.
२- नेतृत्त्वामुळे फलंदाजी कामगिरीलाही येतो बहर
रोहित कर्णधार असताना फक्त संघानेच चांगली कामगिरी केली नाही तर त्याची वैयक्तिक कामगिरीपण तितकीच चांगली राहिलीय. त्याने वनडेत १० सामन्यात भारतीय संघाच नेतृत्व करताना ७८ च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. या १० सामन्यांमध्ये त्याने एक खणखणीत द्विशतक ठोकत एकूण ५४३ धावा केल्या आहेत.
वनडेप्रमाणेच टी२०तही रोहितची बॅट तळपती राहिली आहे. टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असताना त्याने १९ सामने खेळले आहेत आणि ४२ च्या सरासरीने ७१२ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि ५ अर्धशतकेही निघाली आहेत. एवढेच नाही तर, त्याची आयपीएलमध्ये कर्णधार झाल्यानंतरचीही कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे कर्णधारपदामुळे रोहितमधला फलंदाज अजून जास्तच पेटून उठतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
३- क्रिकेटची आहे चांगली जाण
एक संघनायक आणि फलंदाज म्हणून तर रोहित उत्कृष्ट राहिला आहेच. पण संघाचा नेता असतानाही त्याने आपल्या शिलेदारांनापण तितकचं जपले आहे. म्हणूनच आजपर्यंत रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या खेळाडूंनी, नेहमी त्याचं कौतुक केले आहे. रोहित खेळताना स्वातंत्र्य देतो, तो खेळाडूंवर विश्वास दाखवतो, त्यांना सतत संधी देण्याचं काम करतो. त्यामुळेच खेळाडूही त्याच्या नेतृत्त्वात चांगली कामगिरी करताना दिसतात.
तसेच रोहितला खेळाचीही चांगली जाण आहे. बऱ्याचदा तो मैदानावर असताना या गोष्टीचा प्रत्यय येतो. चालू सामन्यात योग्य वेळी योग्य क्षेत्ररक्षण लावताना किंवा गोलंदाजीत बदल करताना तो दिसतो. अनेकदा त्याच्या या निर्णयांमुळे संघाच्या पारड्यात विजय पडल्याचंही दिसलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
”विराटला हटवले ते चांगले झाले”; ऑसी दिग्गजाचे वादग्रस्त विधान
ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर