भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket team) डिसेंबर महिन्याअंती दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्यावर सुरुवातीला भारतीय संघाला ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) खेळायची आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासाठी, २६ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान होणारी ही कसोटी मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे.
कारण हे शिलेदार गेल्या काही काळापासून चांगले प्रदर्शन करण्यात सातत्याने अपयशी होताना दिसत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना आपल्या प्रदर्शनात सुधार करण्याची शेवटी संधी मिळेल. परंतु इथेही त्यांनी पुन्हा निराशाजनक प्रदर्शन केले तर त्यांना कायमचे संघाबाहेर (Dropped From Indian Test Team) केले जाऊ शकते. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
इंडियन एक्सप्रेसनुसार, ईशांतसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरू शकतो. कारण तो गेल्या काही महिन्यांपासून कसोटीत विकेट्स घेण्यात अयशस्वी ठरतो आहे. त्याने यंदा वर्षभरात ८ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १४ विकेट्स घेतल्या आहेत.
ईशांतव्यतिरिक्त रहाणे आणि पुजाराच्या स्थानावरही टांगती तलवार आहे. रहाणेने यावर्षी १२ कसोटी सामने खेळताना ४११ धावा केल्या आहेत. तर पुजाराने १३ कसोटी सामन्यांमध्ये ६८६ धावा केल्या आहेत. परंतु त्यांच्या कामगिरीत तितके सातत्य नसल्याने त्यांचे स्थानही धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, खराब फॉर्ममुळे रहाणे रहाणेची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुनची हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांना पुन्हा लयीत परतण्याची अंतिम संधी मिळेल.
या खेळाडूंविषयी बोलताना बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले की, “रहाणेला उपकर्णधारपदावरुन काढून त्याला एकप्रकारे चेतावणीच दिली गेली आहे. तो संघाचा वरिष्ठ सदस्य असल्यानात्याने त्याने संघात जास्त योगदान द्यायला पाहिजे. हीच गोष्ट पुजारावरही लागू होते. तो गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे आणि त्याच्याकडून आम्हाला मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. जर दक्षिण आफ्रिकेत त्यांचे प्रदर्शन चांगले राहिले तरच त्यांना पुढे संघात सहभागी केले जाईल. पण त्यांना ४०-५० धावा करून काम चालणार नाही, त्यांनी अजून मोठ्या खेळी खेळायला पाहिजेत. पण जर ईशांतविषयी बोलायचे झाले तर, त्याच्यासाठी हा अखेरचा दौरा असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना
अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस