सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा प्रमुख अष्टपैलू कृणाल पंड्या हा मंगळवारी (२७ जुलै) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील आठ खेळाडूंनादेखील क्वारंटाईन केले गेले होते. मात्र, सध्या आलेल्या वृत्तानुसार कृणालसह इतर सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक आली असून, उभय संघांमधील दुसरा टी२० सामना बुधवारी खेळला जाईल असे सांगण्यात आले आहे.
बीसीसीआय सचिवांनी दिल्ली माहिती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना २७ जुलैऐवजी २८ जुलै रोजी खेळला जाईल. मंगळवारी सामन्याअगोदर सर्व खेळाडूंची ऐंटीजन चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कृणाल पंड्या सकारात्मक आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील आठ खेळाडूंनादेखील क्वारंटाईन केले गेलेले. आता या सर्वांची आरटी-पीसीआर टेस्ट केली गेली असून, ती नकारात्मक आली आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने सलग दिवशी खेळले जातील.”
भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात ३८ धावांनी शानदार विजय मिळवला होता. मात्र, मागील महिनाभरापासून बायो-बबलमध्ये असलेला कृणाल अचानकपणे कोरोना पॉझिटिव्ह कसा आला? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
कृणाल राहणार श्रीलंकेत
संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आली असली तरी, कृणालला क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्याला खोकला आणि घशात खवखव होतेय. श्रीलंका सरकारच्या नियमानुसार, कृणाल ३० जुलै रोजी भारतीय संघासह मायदेशी रवाना होणार नाही. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आणि अखेरची आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक येईपर्यंत त्याला श्रीलंकेत राहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना
धोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली ‘ही’ मागणी
कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेत पडली इंग्लंडमधील ‘विराटसेना’, ‘हे’ आहे कारण