भारत आणि नेदर्लंड यांच्यातील सराव सामना मंगळवारी (3 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरममध्ये आयोजित केला गेला होता. मात्र, पावसामुळे हा सामना पंचांना अखेर रद्द करावा लागला. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा हा सलग दुसरा सराव सामना आहे, जो पावसामुळे रद्द केला गेला. याच पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव संघ ठरला आहे, जो यावर्षीच्या विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात एकदाही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकला नाही.
दरम्यान, भारतीय संघाने मागच्या काही दिवसांमध्ये तब्बल 6000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास गेला आहे. पण यादरम्यानच्या काळातील दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. विश्वचषकापूर्वी पावसाने सामन्यांमध्ये अणलेली बाधा नक्कीच सर्व संघांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. भारतीय संघाने आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळला होता. त्यानंतर संघ विश्वचषकापूर्वी आपला पहिला सामना खेळण्यासाठी गुवाहीटीमद्ये दाखल झाला, जो खेळला गेला नाही. त्यानंतर संघा आपला दुसरा सराव सामना खेळण्यासाठी तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाला. पण एवढ्या मोठ्या प्रवासानंतर संघाच्या हाती फक्त पाऊस लागला आहे.
दरम्यान, यावर्षीचा विश्वचषक भारतात होणार असल्यामुळे जयमान संघाला मायदेशातीर परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार असून भारताला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. (A practice match between India and Netherlands was called off due to rain)
महत्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू होणार गांधी-जिना ट्रॉफी? विश्वचषकातील सामन्याआधी आला प्रस्ताव
यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान