भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच कडक बायो बबल असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील वृद्धिमान सहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर, बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता येत्या २९ मे रोजी बीसीसीआयची एक विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये आयपीएल २०२१ स्पर्धा आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, प्रतिष्ठित स्पर्धा दोन शहरांमध्ये ठेवण्याची वेळ आली तरीही बीसीसीआयला यावर्षी टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायचे आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआयने युएईला दुसरा पर्याय बनविला आहे. तसेच बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “भारत सध्या, टी-२० विश्वचषक स्पर्धेचा यजमान आहे. बोर्ड याच दिशेने पहात आहे. जर परिस्थिती खराब झाली, तर जून महिन्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच यूएई हा दुसरा पर्याय आहे.” या अहवालात असेही म्हटले आहे की आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यासाठी इंग्लंड हा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत होऊ शकते कपात
असे म्हटले जात आहे की, आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंड मध्ये केले जाऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. जर या मालिकेत ४ सामने खेळवले गेले तर असे होऊ शकते. ही मालिका जर ६ सप्टेंबर रोजी समाप्त झाली तर, भारतीय संघाला अतिरिक्त ८ दिवस मिळू शकतात. जर या स्पर्धेचे आयोजन १० किंवा ११ सप्टेंबरला करण्यात आले तर, ३० तारखेपर्यंत संपूर्ण हंगाम संपवता येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड सोबत चर्चा करणार आहे. परंतु याबाबत अजून कुठलेही अधिकृत वृत्त हाती आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौर्यावर भुवनेश्वर नाहीतर हा खेळाडू होणार कर्णधार, दोन भावांच्या जोड्याचांही संघात समावेश