जडेजा पुढे म्हणाले की, “मी दुसऱ्या कुणाविषयी विचार करू शकत नाही. कारण मला वाटते खी, या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत. तो सचिनपासून फक्त एका फोनच्या अंतरावर आहे. मला वाटते की, विराटने जर फोन केला नाही, तर सचिननेच त्याला फोन केला पाहिजे. अनेकदा युवा खेळाडू अशा खराब काळातून जात असतात. जेव्हा तुम्ही मोठे असता आणि तुम्ही असा काळातून गेलेले आहात, त्यामुळे तुमचे काम आहे की, तुम्ही फोन करावा. मला आशा आहे मास्टर (सचिन) असे करेल.”

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना १७ जुलै रोजी खेळला जाणार आहे. विराटकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघाले नाहीये आणि चाहते त्याचे शतक पाहण्यासाठी आतुर आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

याला काय अर्थय! भारतीय खेळाडूंना साधे कॅचही पकडता येत नाहीत, ६ सामन्यात सोडलेत ‘एवढे’ झेल

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना ३६० धावा पण पुरेना, आयर्लंडच्या फलंदाजांनी काढलाय घाम

म्हणून भारताला २०२३च्या विश्वचषकात महत्वाचे स्थान, विश्वविजेत्या इंग्लंडला डावलत टीम इंडियाला पहिले प्राधान्य