भारतीय क्रिकेटसाठी २७ नोव्हेंबर हा दिवस विशेष आहे. आजच्या दिवशी १९९३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये हीरो कपचा अंतिम सामना खेळवला गेला होता. कोलकातामध्ये भारताने विंडीजला १०२ धावांच्या फरकाने हरवलं होतं. दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेने १२ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. भारताचे कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला मालिकावीर ठरवण्यात आलं होतं.
कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने २२५ धावा ७ गडी गमावून केल्या होत्या. विंडीजचा डाव १२३ धावांवरच संपला आणि यजमान संघ १०२ धावांनी विजयी ठरला होता. तेव्हा भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन होता आणि त्याला मालिकावीर ठरवण्यात आले होते.
वेस्ट इंडीजचे कर्णधार रिची रिचर्ड्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. सलामी फलंदाज अजय जडेजाने विनोद कांबळीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या होत्या. कांबळीने ६८ धावा केल्या होत्या. त्याने ९० चेंडूत ६ चौकार मारत ६८ धावा केल्या होत्या. कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने ३८ धावा, तसेच सचिन तेंडुलकरने २८ नाबाद धावा केल्या. विंडीजकडून अँडरसन कमिन्सने ३ विकेट्स घेतल्या.
२२६ धावांच्या लक्ष्याचा पिच्छा करताना विंडीजला पहिला धक्का बसला, जेव्हा मनोज प्रभाकरने फिल सिमन्सला त्रिफळाचीत केले. संघाने पहिली विकेट ५६ धावांत गमावली होती, पण बाकीच्या ९ विकेट्स फक्त ६६ धावांमध्ये गमावल्या. विंडीजचे ४०.१ षटकात १२३ सर्व गडी बाद झाले. विंडीजकडून ब्रायन लाराने सर्वाधिक ३३ धावा केल्या होत्या. ३ फलंदाज शून्यावर बाद झाले होते. अनिल कुंबळेने ६.१ षटकं टाकून १२ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनापैकी एक होते.
अनिल कुंबळेने भारताला असे बरेच सामने स्वतः जिंकवून दिले होते. त्याने १३२ कसोटी सामन्यात ६१९ विकेट्स घेऊन विक्रम केला आहे. ह्यासोबतच वनडेमध्ये ३३७ विकेट्स घेतल्या. घरगुती क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या कुंबळेने प्रथम श्रेणीमध्ये खेळताना एकूण ११३६ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मुंबई कसोटीत विराटच्या बॅटमधून निघणार शतक? विश्रांतीवर असूनही घेतोय भरपूर मेहनत
‘आर अश्विन सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम अष्टपैलू’, विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराने उधळली स्तुतीसुमने
कानपूर कसोटीत व्हायरल झालेला ‘गुटखा मॅन’ म्हणतोय, “आता मी वैतागलोय”