भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या अपेक्षेने या दौऱ्यासाठी भारतात दाखल झालेला. मात्र, ते पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा प्रतिकार करू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर बोलताना ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांनी आपल्या संघाचे अपयश मान्य केले.
नागपूर कसोटी सहज जिंकल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात थोडासा संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पीटर हॅंड्सकॉम्ब व उस्मान ख्वाजा यांच्या खेळाच्या जोरावर 263 धावा उभ्या केलेल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर गडगडल्याने भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे आव्हान राहिले. भारतीय संघाने चार गडी गमावत हे आव्हान पार केले. सामन्यात दहा बळी मिळवणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.
दोन्ही सामने तीन दिवसांच्या आत समाप्त झाल्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या एकूण कामगिरीवर जोरदार टीका होतेय. असे असतानाच ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांनी आपले खेळाडू भारताच्या या परीक्षेत नापास झाल्याचे म्हटले. दुसऱ्या सामन्यानंतर बोलताना ते म्हणाले,
“आम्ही जसा खेळ दाखवला त्यामुळे आमच्यावर टीका होते. आणि ही टीका व्हायलाच हवी. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जसा खेळ केला त्यावरून वाटले ते की, आम्ही हा सामना जिंकू. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात संघाने सामना गमावला. भारतात पोहोचल्यानंतर बेंगलोर येथे आमची तयारी चांगली झाली आहे असे आम्हाला वाटलेले. मात्र, काही खेळाडू योग्य रणनीतीवर अंमल करू शकले नाहीत. परंतु, परभावासाठी कोणतीही कारणे नसतात.”
मॅकडोनाल्ड यांनी मागील वर्षी ऍशेस मालिकेनंतर जस्टिन लॅंगर यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून इंदोर येथे खेळला जाईल.
(Australia Head Coach Andrew McDonald Said We Fail In India Exam After Delhi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडे सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याची शेवटची संधी, जाणून घ्या कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर