भारतीय संघाने यंदाच्या टी20 विश्वचषक मधील सेमीफायनल-2 मध्ये इंग्लंडवर शानदार विजय मिळवलाआहे. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा स्पर्धेतून पत्त कट केला. हा सामना भराताने 68 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील अंतिम फेरीत धडक मारला आहे. तर या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेलने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या इशाऱ्यावर नाचवले. अक्षरने सामन्यात शानदार कामगिरी केली. ज्यामुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देखील मिळाला.
अख्या जगाचे लक्ष असेलेल्या या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी करत इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला. सामन्यात डावखुऱ्या अक्षर पटेलने चमकदार कामगिरी केली. त्याने आधी फलंदाजी करत 6 चेंडूत महत्वपूर्ण 10 धावा केल्या तर गोलंदाजीत 4 षटकात 23 धावा देत 3 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीवर सामनावीरचा पुरस्कार देण्यात आले आहे. अक्षर पटेलने जाॅस बटलर, मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो या तिघांना तबूंत पाठवून इंग्लंड संघाच्या फलंदाजी युनीटचा कणा मोडला. त्यामुळे इंग्लंड संघ 103 धावांवर ढेपाळला आणि भारताने हा सामना 68 धावांनी जिंकला.
पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकात 171 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 57 धावांची खेळी खेळली. प्रत्युतरात इंग्लंड संघ 103 धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर इंग्लंडसंघाचा टिकाव लागला नाही. संघ मर्यादित 20 षटके देखील खेळू शकला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजीत कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर वेगवान जसप्रीत बुमराहने 2 गडी टिपल्या. आता भारतीय संघाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना रंगणार आहे. हा सामना 29 जून रोजी बार्बाडोस येथे होईल.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडिया फायनलमध्ये पोहचताच कर्णधार रोहित शर्मा भावूक, कोहलीनं सावरंल
बदला पूर्ण! इंग्लंडला हारवून भारताची फायनलमध्ये थाटात एँट्री…!
कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा गोलंदाजी रेकाॅर्ड अक्षर पटेलनं काढला मोडीत