भारतीय संघ (Team India) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळल्या जाणार आहेत. यासाठी वेस्ट इंडीज संघ पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. बीसीसीआयच्या टूर आणि फिक्शर कमिटीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या या आगामी मालिकांसाठी काही महत्वाचे मुद्ये सुचवले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मालिकेच्या नियोजनात काही महत्वाचे बदल होऊ शकतात.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिका ६ ते २० फेब्रुवारीदरम्यान खेळल्या जाणार आहेत. मालिकेतील सामने अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टनम आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये आयोजित केले जाणार होते. परंतु कोरोनाच्या विषाणूचा प्रदुर्भात दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आता हे सामने अहमदाबाद आणि कोलकाता या दोन शहरांमध्येच आयोजित करण्यात येऊ शकतात. बीसीसीआयने याविषयी संकेत दिले आहेत. कमिटीने यासंदर्भातील शिफारस बुधवारी रात्री पदाधिकाऱ्यांना पाठवली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, क्रिकेट वेस्ट इंडीजने (Cricket West Indies) यापूर्वीच सांगितले आहे की, त्यांना सामन्याचे आयोजित दुसऱ्या शहरांमध्ये केल्याची माहीती अद्याप दिली गेली नाहीये. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने असे केले गेले, तर त्यांना काहीच अडचण नाहीये. सामन्याचे ठिकाण जरी बदलले तरी त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार आहे.
कोरोनाचे रुग्ण फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत असल्याचे पाहिले गेले आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील टी२० मालिका याच कारणास्तवर रद्द केली गेली. तसेच, दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका बायो बबलमध्ये आणि प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जात आहे. सुरक्षेची खबरदारी म्हणून बीसीसीआय आणि दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्ड यांना हा निर्णय घेतला होता. आता आगामी मालिकेत देखील बीसीसीआयला आवश्यक पाऊल उचलावे लागणार आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीज संघाने नुकतेच आयर्लंड संघासोबत एकदिवसीय मालिका खेळली आहे. या मालिकेत आयर्लंडने विजय मिळवला आहे. कोरोना विषाणूचा परिणाम या मालिकेवर देखील पडला. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पुन्हा आयोजित केला गेला. मालिकेतील पराभवानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड खूपच निराश झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
विराट-बीसीसीआय वाद सुरूच! गांगुली बजावणार होते कोहलीला कारणे दाखवा नोटीस
गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…”
विराटने कर्णधारपद सोडताच पहिले स्थानही गमावले!! आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे मोठे नुकसान
व्हिडिओ पाहा –