भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) अलिकडच्या काळात सतत विवादात राहिले आहेत. अशात एकदा पुन्हा गांगुली चर्चेचा विषय ठरले आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय आणि १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका खेळली जाणार आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धची टी२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली जाणार आहे. अशात बंगाल क्रिकेट असोसीएशन (CAB) आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचे दिसत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारली गेली आहे. परंतु टी२० मालिकेविषयी मात्र चित्र अस्पष्ट झाले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये ७५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. परंतु, बीसीसीआय अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, बोर्ड खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या आरोग्याचा धोका पत्करू शकत नाही. याच कारणास्तव टी२० मालिकेत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नसल्याचे गांगुलींनी स्पष्ट केले.
बीसीसीआय आणि सीएबीमध्ये ताळमेळाची कमतरता
बीसीसीआय अध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आहे. तर बंगाल क्रिकेट असोसिएशन यामुळे हैराण झाले आहे. सीएबीचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले की, त्यांना यासंदर्भात कसलीही माहिती मिळालेली नाहीय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दालमिया म्हणाले की, “माध्यमांमध्ये बातम्या आहेत की, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ईडन गार्डन्समध्ये होणाऱ्या ३ टी२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाहीये. परंतु आम्हाला अजूनपर्यंत बीसीसीआयकडून याविषयी कसलीही लिखित सुचना मिळाली नाहीय. अशात आम्ही या मुद्यावर सध्या कसलीही प्रतिक्रिया देणार नाही.”
.@CabCricket president Avishek Dalmiya:
"There are reports in the Media that spectators would not be allowed during three T20Is between India and West Indies to be held at Eden Gardens owever, we have not received any written intimation or information…" (cont.)#INDvWI
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) February 4, 2022
दरम्यान, गांगुलींनी यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सीएबीने जरी प्रेक्षकांना परवानगी दिली असली तरी, बीसीसीआय मात्र ही परवानगी नाकारणार आहे. ते म्हणाले होते की, “आम्ही तीन टी२० सामन्यांसाठी ईडन गार्डन्समध्ये प्रेक्षकांना परवानगी देणार नाही. लोकांसाठी कोणतेच तिकिट नसेल. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या विभागाच्या प्रतिनिधिंना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी असेल. अशा परिस्थितीत आम्ही प्रेक्षकांना परवानगी देऊन खेळाडूंचे आरोग्य धोक्यात टाकू नाही शकत.” गांगुलींच्या या वक्यतव्यानंतर सीएबी आणि बीसीसीआय यांच्यातील संवादाची कमतरता जगासमोर आली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा विचार केला, तर एकदिवसीय मालिकेचे सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला खेळले जातील. तर टी२० मालिकेचे सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
हरियाणा स्टीलर्सचा बंगालला घाव! कर्णधार विकास कंडोलाची धडाकेबाज कामगिरी
मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपरजायंट्सच्या प्रशिक्षकांनी घेतला धक्कादायक निर्णय
“आता फक्त तेच इंग्लंड क्रिकेटला सुधारतील”; माजी कर्णधाराने प्रशिक्षकपदासाठी सुचविले नाव