टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने जाहीर केले आहे की, त्यांचा संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, पण 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारतासोबत होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकेल. या निर्णयामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सुरक्षा आणि आयसीसीच्या (ICC) काही निर्णयांचा निषेध म्हणून पाकिस्तानने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. याआधी पाकिस्तानने अनेकदा भारतात होणाऱ्या स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, पण वर्ल्ड कपमधील सामना सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
1990-91: राजकीय तणावामुळे पाकिस्तानने भारतात झालेल्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.
2008: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) बंद केल्या. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच समोरासमोर येतात.
या बहिष्कारामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. हा सामना ‘फॉरफिट’ (सोडून दिलेला) मानला जाईल. त्यामुळे पाकिस्तानला महत्त्वाचे 2 पॉइंट्स गमवावे लागतील, जे थेट भारताच्या खात्यात जमा होतील. भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसीसाठी सर्वाधिक कमाई करून देणारा सामना असतो. या बहिष्कारामुळे आयसीसीसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही मोठा आर्थिक तोटा आणि जागतिक स्तरावर प्रतिमेचे नुकसान सहन करावे लागेल.






