कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव चीननंतर आता इटली आणि इराणमध्ये पहायला मिळत आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देशांनी आपापल्या देशांची विमानसेवा बंद केली आहे. यामुळे अनेक लोक त्या देशांमध्ये अडकले आहेत.
यामध्ये काही भारतीयांंचाही समावेश आहे. ज्यात एक आयपीएल (IPL) खेळणारा भारतीय खेळाडू आनंद राजनचे (Anand Rajan) वडील (Father) आहेत. या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेल्या इराणमध्ये मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या राजनचे वडील अडकले आहेत.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार आनंद राजन म्हणाला की, भारत सरकार इराणमधून अनेक भारतीयांना भारतात घेऊन आले आहे. आशा आहे त्याचे वडीलही परत येतील. इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २० हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
सध्या इराणचा (Iran) संपर्क सर्व देशांपासून तुटला आहे. तसेच तो इतर अनेक समस्यांपासून झगडत आहे. राजनने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की भारतीय दूतावास केवळ त्या लोकांना प्रवास करण्याची परवानगी देत आहे, ज्यांची वैद्यकीय तपासणी ते स्वत: करत आहेत.
राजन पुढे म्हणाला की, परंतु त्यांनी असे सांगितले की दूतावासाकडे या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य नाही. तसेच पुढील आठवड्यापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगीही दिलेली नाही.
राजनने इराणमधील भारतीय दूतावासाकडे (Indian Embassy) मदत मागण्यासाठी ट्वीटदेखील केले आहे. तसेच त्यांनी राजनच्या वडिलांशी संपर्क साधण्याचे आश्वासनही दिले आहे. परंतु शनिवारपर्यंत काहीही झालेले नाही.
तसेच राजन म्हणाला की, सध्या त्याचे वडील ठीक आहेत आणि ते घरातच राहतात. या व्हायरसमुळे भारत सरकार इराण, जपान, मिलानबरोबरच अनेक देशांमधून भारतीयांना परत घेऊन आले आहेत. भारताच्या १९ वर्षाखालील संघासाठी खेळलेल्या राजनने सांगितले की, त्याचे वडील मागील ८ वर्षांपासून तेहरामनध्ये काम करत आहेत.
मध्यम गतीने गोलंदाजी करणारा राजन आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) आणि सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशकडून त्याने ४० अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोहली-एबीमध्ये कोण भारी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले हे उत्तर
-रोहित एशिया कप खेळला तर या ४पैकी एका खेळाडूला बसावे लागणार घरी
-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य