सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली खेळी केली आहे. भारतीय संघाने लॉर्ड्सवर विजय मिळवला; तर इंग्लंडने लीड्सवर आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह दोन्ही संघ या मालिकेत आता १-१ ने बरोबरी केली आहे. मात्र या दरम्यान तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघात मोठ्या बदलांबाबत संकेत दिले होते.
त्यामुळे ओव्हलमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल झालेले दिसू शकतात. तसेच अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे की, भारताचा फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विन पुढील कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो.
मात्र, गुरुवारी (१ सप्टेंबर) भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी अश्विनच्या खेळण्याबाबत सामन्याच्या काही वेळ अगोदर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच अरुण यांच्या मते अश्विनच्या खेळण्यातील कौशल्यामुळे इंग्लंडचा संघ चिंतित आहे. मात्र, तरीही अजूनही अश्विनचे अंतिम ११ मध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
या मालिकेत अश्विनला अजूनही संधी दिली गेली नाही. त्याऐवजी भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला तिनही कसोटी सामन्यात संधी दिली होती. यावर अरुण म्हणाले, “अश्विन हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, दुर्भाग्याने तो अजूनही खेळू शकला नाही. जर संघाच्या रणनीतीनुसार अश्विनची संघात जागा बनत असेल, तर दोघेही एकत्र खेळू शकतात.”
तसेच इंग्लंडमधील ओव्हलच्या खेळपट्टीवर देखील अरुण यांनी भाष्य केले. अरुण यांच्या मते अश्विन हा उत्कृष्ट फिरकीपटू आहे, याची इंग्लंडच्या फलंदाजांना भीती आहे. ज्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी खेळपट्टीत बदल केले जाऊ शकतात. तसेच इंग्लंडमधील वातावरण देखील अनिश्चित असे आहे.
यावर बोलताना ते म्हणाले, “ओव्हलचे मैदान फिरकीपटू गोलंदाजांसाठी पोषक आहे. मात्र इंग्लंडचा संघ या खेळपट्टीत काही बदल करू शकतो, ज्याने फिरकीपटू गोलंदाजांना कमी मदत मिळेल. त्यामुळे गुरुवारी सकाळी सामन्यापूर्वी खेळपट्टीला पाहूनच संघ निवडण्यात येईल. कारण, आजपासून ते उद्यापर्यंत या वेळेत खूप काही होऊ शकते. त्यामुळे आम्ही तेव्हाच निर्णय घेऊ की, अश्विन खेळणार की नाही?”
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरने पारिवारिक कारण देत उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघात देखील बदल झालेले दिसून शकतात. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर गुरुवारी (२ सप्टेंबर) पासून ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्म्रीती मंधानाच्या क्यूट अन् क्रेझी अंदाजाने वेधले सर्वांचेच लक्ष; म्हणतेय, ‘नैना दा क्या कसूर’
–‘भारत एक अद्भुत ठिकाण, तिथे क्रिकेटरला एखाद्या सिताऱ्यासारखी वागणूक मिळते’
–रिषभ पलटवार करण्यास सज्ज, इंग्लंडच्या गोलंदाजांचे सगळे नुसके फेल ठरवण्यासाठी मिळालाय ‘हा’ कानमंत्र