फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आयपीएल 2023मधील प्रवास रविवारी (21 मे) संपला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. कर्णधार फाफ डू प्लेसिस याने या पराभवासाठी संघातील काही खेळाडूंना जबाबदार धरले. सोबतच विरोधी संघातील शुबमन गिलचे कौतुकही केले.
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर चांगलाच निराश असल्याचे पाहायला मिळाला. त्याच्या मते आरसीबीसाठी वरच्या फळीतील फलंदाजांनी या हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, संघासाठी फिनिशरची भूमिका कोणताच फलंदाज चांगल्या पद्धतीने पार पाडू शकला नाही. डू प्लेसिसने यावेळी एकप्रकारे दिनेश कार्तिक यालाच सुनावले.
डू प्लेसिस म्हणाला, “फलंंदाजीचा विचार केला, तर पहिल्या चौघांनी खरोखर चांगले योगदान दिले. आम्ही पूर्ण हंगामात मध्यक्रमात सासत्याने धावा केल्या नाहीत. खासकरून डावाच्या शेवटी. आम्हाला मध्यक्रमात इतक्या अपेक्षित विकेट्सही मिळाल्या नाहीत. विराटने खरोखर चांगली कामगिरी केली. एक भागीदारी म्हणून एकही असा सामना झाला नाही, ज्याणध्ये सलामीवीर जो़डीने 40 पेक्षा कमी धावांचे योगदा नदिले असले. पण आम्हाला फिनिशिंगमध्ये सुधारणा करावी लागेल. मागच्या वर्षी दिनेश कार्तिकने अप्रतिम प्रदर्शन केले होते. पण यावर्षी असे होऊ शकले नाही. ज्या संघांना यश मिळाले आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक समजते की, त्यांचे पाच, सहा किंवा सात क्रमांकाचे फलंदाज मोठे फटके खेळणारे आहेत.”
डू प्लेसिसने यावेळी एक लक्षवेधी भाष्यही केले. त्याच्या मते आरसीबीने या हंगामात काही सामने गाजवले, त्या संघाचे चांगले नशीब असल्यामुळे. तसे पाहता आरसीबील प्लेऑफसाठी पात्र ठरण्यालायक संघ नव्हता, असे डू प्लेसिसला वाटते. तो म्हणाला, “प्रामानिकपणे सांगतो, आम्ही आयपीएलमधील सर्वोत्तम संघ नव्हतो. सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. जर लीग स्टेजमधील 14ही सामन्यांचा विचार केला, तर फ्लेऑफमध्ये खेळण्यासाठी दावेदार नव्हतो. आम्ही मागे राहिलो, यासाठी नराशा होतेच.”
“या पराभवामुळे संघ खूप निराश आहे. आज आम्ही खरोखर खूप मजबूत संघ खेळवला होता. पण शुबमन गिलने शतक ठोकले आणि आम्हाला विजयापासून दूर घेऊन गेला. चेंडू पहिल्या डावापेक्षा दुसऱ्योा डावात जास्त ओला होत होता. अशात आम्हाला अनेकदा चेंडू बदलावा लागला. विराटने अविश्वसनीय खेळी करत आम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले,” असेही डू प्लेसिस पुढे म्हणाला. दरम्यान, आरसीबीच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली. आयपीएल 2023च्या प्लेऑफ फेरीत गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ जागा मिळवू शकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीला दगा! अटीतटीच्या सामन्यात नाही खेळला हुकमी एक्का, पण डब्ल्यूटीसीमध्ये भारताविरुद्ध आग ओकण्यास तयार
गिलच्या विजयी षटकारामुळे मुंबई प्ले-ऑफ्समध्ये, RCB हारताच ‘पलटण’च्या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल