आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवात खराब क्षेत्ररक्षणाचा खूप मोठा हात होता. भारतीय संघाचे माजी खेळाडू अजय जडेेजा यांनी कर्णधार रोहित शर्मा याला खराब क्षेत्ररक्षणासाठी जबाबदार धरले आहे.
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 भारतीय संघाला आपल्या मागच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागलेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जितकी निराशा केली, तितकीच गोलंदाजांनी आपल्या प्रदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, क्षेत्ररक्षणाने भारतीय संघाला विजयापासून लांब ठेवले. या सामन्यादरम्यान विराट कोहली (virat Kohli) कडून एक झेल सुटला तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एक धावबाद करण्याची संधी गमावली. भारतीय संघाचे माजी खेळाडू अजय जडेजा यांनी खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जडेजा म्हटले,” विराट कोहली कर्णधार असताना मी ऐकलेले की भारतीय संघ क्षेत्ररक्षणाला महत्व देण्याविषयी बोलत आहे. त्याने असा निर्णय घेतलेला की संघात तेच खेळाडू खेळतील, जे चांगले क्षेत्ररक्षकही असतील. आता कर्णधार आणि प्रशिक्षक दोन्ही बदलले आहेत. नवा कर्णधार रोहित शर्मा हा क्षेत्ररक्षणाबाबत एकदम निश्चिंत आहे. त्याच्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी हेच जास्त चिंतेचे विषय आहेत. जे आता भारतीय संघात खेळत आहेत, ते जास्त एथलेटीक नाहीयेत.”
जडेजाने याशिवाय रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांचे देखील चांगलेच फटकारले आहे. भारतीय क्षेत्ररक्षणाबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हटले,”आपल्या संघात अश्विन आणि शमी सारखे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर ते खुप चांगले खेळाडू असतील. मात्र, तुम्ही त्यांच्या कडून चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा करू शकत नाही. जेव्हा आपण संघ निवडतो, त्यावेळी आपल्याला माहिती असते की आपल्याला काय पाहिजे आणि काय नको आहे. माझ्यामते, भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाला जास्त महत्व दिले आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुरेश रैना पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस! अबू धाबी टी-10 लीगमध्ये ‘या’ संघासोबत केला करार
अरे तू कसोटी खेळतोय का? टी20 वर्ल्डकपमध्ये कॅप्टन केनच ठरतोय न्यूझीलंडचा कच्चा दुवा