मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये शनिवारी (२ ऑक्टोबर) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभूत केले. या विजयाचे श्रेय अक्षर पटेल आणि आवेश खान यांना देखील जाते, ज्यांनी प्रत्येकी ३-३ फलंदाजांना माघारी पाठवले.
दरम्यान आवेश खानने आक्रमक फलंदाज हार्दिक पंड्याला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. परंतु ज्याप्रकारे तो बाद झाला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
दुखापतीतून परतलेला हार्दिक पंड्या सध्या गोलंदाजी करताना दिसून येत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तो गोलंदाजी करताना दिसून आला नाही. त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा होती की, तो फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणार. परंतु असे काहीच झाले नाही. तो १८ चेंडूंमध्ये १७ धावा करत माघारी परतला.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे हार्दिक पंड्यावर सर्वांचे लक्ष टिकून होते. त्यावेळी १९ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला होता. आवेश खानने पहिलाच चेंडू अचूक यॉर्कर चेंडू टाकला, जो हार्दिक पंड्याच्या दोन्ही पायांच्या मधून निघाला आणि यष्टीला जाऊन धडकला. या चेंडुची गती आणि अचूकता इतकी होती, की तो चेंडू हार्दिक पंड्याच्या बॅटला स्पर्श देखील झाला नाही. आवेश खानने या डावात ४ षटके गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने १५ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.
https://twitter.com/CowCorner9/status/1444269212457844740?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1444269212457844740%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fhardik-pandya-clean-bowled-by-avesh-khan-in-ipl-2021-video-84925
दिल्ली कॅपिटल्स संघाचा अद्भुत विजय
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ३३ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने १९ आणि हार्दिक पंड्याने १७ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ८ बाद १२९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून श्रेयस अय्यरने नाबाद ३३ तर रिषभ पंतने २६ आणि आर अश्विनने नाबाद २० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-