टी-२० विश्वचषक २०२१मध्ये भारताच्या निराशेमागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे संघात कुठेतरी संतुलन नसणे. यानंतर, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठीच्या समस्येतून बरा झाल्यानंतर पूर्णपणे फलंदाज म्हणून संघात सामील झाला. त्यानंतर त्याने आपल्या क्रीडा स्तरावर सतत सराव करताना कठोर परिश्रम घेतले. आता सध्या तो भारतासाठी एक प्रमुख खेळाडू आहे. याबद्दलच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने एक महत्वाचे विधान केले आहे.
भारताने आता आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी एक उत्तम संतुलित संघ निवडला आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्या देखील आपल्या शानदार खेळाने स्थान मिळवू शकला. आशिया चषक स्पर्धेसाठी १५ जणांच्या संघाची घोषणा केल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पंड्या आणि भारतीय टी-२० संघातील त्याच्या स्थानाबाबत मोठे विधान केले आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना माजी क्रिकेटपटू आकाशने टी-२० मध्ये हार्दिकच्या महत्त्वावर भर दिला की, “भारत विराट कोहली, रोहित शर्मा आणि अगदी जसप्रीत बुमराह यांचा बदली खेळाडू आपण शोधू शकतो परंतु हार्दिकच्या बाबतीत असे अजिबात नाही. या खेळाडूशिवाय आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे सर्व प्लॅन्स फोल ठरतील.”
आकाश चोप्रा म्हणाला की, “तो खूप चांगली कामगिरी करत आहे यात शंका नाही. हार्दिक पंड्या हा त्या संघातील एकमेव खेळाडू आहे जो तो समतोल सिद्ध करत आहे. त्याच्याशिवाय, सर्व चांगल्या योजना अयशस्वी होतील. तुम्हाला विराट कोहली, रोहित शर्मा, अगदी जसप्रीत बुमराहचा पर्याय सापडेल. पण जर हार्दिक पंड्या तिथे नसेल तर तुम्ही प्लेइंग ११ पूर्ण करू शकत नाही.”
दरम्यान, हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंजत होता. त्यामुळे तो मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर झाला होता. त्यनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाचे नेतृत्व करत विजेतेपदाचा मान मिळवला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला आयर्लंडविरुद्ध भारताचे नेतृत्व देखील केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून राहुलपेक्षा वरचढ धवन! आकडेवारीत गाठलयं ‘शिखर’
‘एका हंगामात ४०० धावा करूनही संधी मिळत नसेल तर…’, संघनिवडीवरून नितीश राणा निराश
पाटलाच्या लेकानं गाजवलीय कर्नाटकातील टी-२० लीग, शतक ठोकत आयपीेएल पदार्पण केलंय फिक्स