इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच संघर्षपूर्ण झाली. ऍशेस 2023 मधील हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने चौथ्या डावात एकाकी झुंज दिली. त्याने तुफानी दीड शतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. असे असले तरी या सामन्यात जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे धावबाद झाला त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. आता त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
या कसोटीच्या अखेरच्या दिवशी कॅमेरून ग्रीन याने पहिल्या सत्राच्या समाप्तीच्या काही आधीचे षटक टाकताना अखेरचा चेंडू बाऊन्सर टाकला. फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टो याने तो चेंडू सोडला आणि पुढे चालू लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने चेंडू हातात आल्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांना नक्की काय घडले हे न समजल्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यावर त्याला बाद दिले गेले. मात्र, षटक संपले असाच समज करून बेअरस्टो बाहेर उभा राहिला होता.
Hey sledgers….does spirit of the game logic apply to u or is it just for Indians?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 2, 2023
या प्रकरणात ऑस्ट्रेलियाने खेळाडू वृत्ती दाखवायला हवी होती अशी अपेक्षा अनेकांनी केली. गौतम गंभीरने देखील असाच सूर लावला. त्याने ट्विट करत लिहिले,
‘स्लेजर्स, इथे खेळाडू वृत्ती हे लॉजिक वापरता येत नाही का? की ते फक्त भारतीयांसाठीच असते.’
या वादावर चर्चा होत असली तरी आयसीसीच्या नियमानुसार, जोपर्यंत पंच घोषित करत नाही तोपर्यंत षटक समाप्त होत नाही. त्यामुळे बेअरस्टो बाद असल्याचे सांगितले जाते.
(Gautam Gambhir Take Dig On Australia Team For Johnny Bairstow Runout)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मोनिका पटेलला संधी, श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक