येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड संघविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये अभिमन्यू ईस्वरन याला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात स्थान मिळताच त्याने एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
भारतीय संघासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. ही संधी अभिमन्यू ईस्वरनला देखील मिळाली आहे. परंतु हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या ६४ सामन्यात १३ शतके झळकावली आहेत. याबरोबरच १२ अ दर्जाच्या सामन्यात ६ शतके आणि १९ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात एका शतकाचा समावेश आहे.
स्पोर्ट्सकिडा सोबत बोलताना त्याने म्हटले की, “मला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. परंतु मी आता सध्या पुढचा विचार करत नाहीये. मी फक्त इंग्लंड दौऱ्याचा विचार करत आहे. मी तर निवड झाली याबाबतही जास्त विचार करत नाही. मला जितक्या जास्त धावा करता येतील, तितक्या जास्त धावा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. असे केले तर मी दुसऱ्या फॉरमॅटमध्येही भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.”
इंग्लंड दौऱ्यासाठी कशी सुरु तयारी सुरू आहे? हा प्रश्न विचारला असता अभिमन्यू म्हणाला की, “भारतीय कसोटी संघात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला पूर्णपणे तयारी करायची आहे त्या प्रकारची परिस्थिती येथे मिळणे जरा कठीण आहे.”
अभिमन्यू ईस्वरनची कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिमन्यु ईस्वरनने, आतापर्यंत एकूण ६४ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ४४०१ धावा केल्या आहेत. यात त्याने १८ अर्धशतक आणि १३ शतक झळकावले आहेत. तसेच ६२ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने २८७५ धावा केल्या आहेत. यात १८ अर्धशतक आणि ६ शतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने १९ टी-२० सामन्यात ४७१ धावा केल्या आहेत. यात २ अर्धशतक आणि १ शतक झळकावण्यात त्याला यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघातील ‘राजकारणा’स बळी पडत २००९मध्येच निवृत्ती घेणार होता आफ्रिदी, स्वत:च केला उलगडा
‘त्या’ चौघांच्या सागंण्यावरुन युवा कोहलीने अचानक धरले होते सचिनचे पाय, वाचा तो किस्सा