यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आमने-सामने असणार आहेत. भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात धमाकेदार कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या या स्पर्धेत भारत अद्याप एकही सामना हारला नाही. तर इंग्लंडनं या स्पर्धेत 4 सामने जिंकले आहेत. परंतू शेवटच्या टी20 विश्वचषकात इंग्लंडनं सेमीफायनलमध्ये भारताचा निराशाजनक पराभव केला. या विश्वचषकात देखील सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आमने-सामने आहेत. भारताला बदला घेण्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
गुरुवार (27 जून) रोजी भारतासमोर सेमीफायनल 2 साठी पुन्हा इंग्लंडचं आव्हान आहे. जेव्हा भारत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी 10 नोव्हेंबर 2022 रोजी सेमीफायनलमध्ये झालेला पराभव निश्चितच भारताच्या मनात असेल. शेवटच्या टी20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. कर्णधार जोस बटलर (Jos Buttler), ॲलेक्स हेल्स यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर इंग्लंडनं हा सामना जिंकला होता.
तर 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव विसरता आला नाही. 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला भारतीय संघानं घेतला आहे, संपूर्ण नाही परंतू अर्धा तरी. भारतानं सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आणि त्यांना यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर काढलं.
भारताच्या या दामदार कामगिरीमुळे आता भारतीय क्रिकेटप्रेमींना सेमीफायनल सामन्यात भारत इंग्लंडला कधी हारवणार याची आतुरता लागली असेल. यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघानं एकही सामना गमावलेला नाही. 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियानं त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भारताला देखील इंग्लंडला पराभूत करुन बदला घेण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, तालिबानने मानले भारताचे आभार…!!!
खराब क्षेत्ररक्षणामुळे जोनाथन ट्राॅट भडकले, कचराकुंडीला मारली जोरात लाथ
स्टार हॉकीपटूंच्या मैत्रीपूर्ण सामन्याने भरले अनोखे रंग