---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान जाणूनबुजून हरला? 1-2 नव्हे तर चक्क इतक्या कॅच सोडल्या

On: मंगळवार, ऑक्टोबर 15, 2024 12:26 PM
---Advertisement---

यंदाच्या महिला टी20 विश्वचषक 19 वा साखळी सामना सोमवारी (14 ऑक्टोबर) दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जाणूनबुजून हरला? कारण पाकिस्तानच्या विजयामुळे भारताला मोठा फायदा झाला असता. असेही बोलले जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने 1 2 नव्हे तर एकूण 8 झेल सोडले.

सामन्यातील हे सर्व कॅच सोपे होते. गल्ली क्रिकेटमधील मुलं देखील ते कॅच पकडले असते. अर्थात टीम इंडियाला फायदा होऊ नये म्हणून पाकिस्तानने मुद्दाम सर्व कॅच सोडले. असा थेट अर्थ चाहते घेत आहेत. पाकिस्तान जिंकला असता तर टीम इंडियाला फायदा होण्याची अधिक शक्यता होती.

पाकिस्तान महिला संघाने 8 झेल सोडले जे अगदी सहज लॅप्समध्ये आले. टीम कॅच सोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाकिस्तानी खेळाडू कसे सोपे झेल सोडत आहेत.

 

जर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला असता तर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचू शकली असती. वास्तविक, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात अ गटातून दुसरा उपांत्य फेरी गाठण्यासाठी शर्यत होती. जर पाकिस्तानने या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले असते. तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतील तिन्ही संघांचे गुण समान झाले असते आणि त्यानंतर धावगतीच्या आधारावर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले गेले असते. रनरेटमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर होती. अशा प्रकारे पाकिस्तानच्या विजयासह टीम इंडियाला थेट उपांत्य फेरी गाठता आली असती.

हेही वाचा-

ind vs nz; बेंगळुरु कसोटीत कोहलीच्या निशाण्यावर हा मोठा विक्रम!
IND vs NZ: पहिल्याच कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज
ind vs nz; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, 3 फिरकीपटूंना स्थान?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---