भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाला. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर भारत कसोटी मालिकेत यजमानांना पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, पहिल्या दिवशी संघ कसोटी सामन्याची सुरुवात मनाप्रमाणे करू शकला नाही, असेच दिसते. विराट कोहली मागच्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे, पण या कसोटी सामच्या पहिल्या डावात त्याने स्वतःत विकेट गमावली.
विराट कोहली बांगलादेशविरुद्दच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शतकीय खेळी करू शकला. त्याने इशान किशन याच्यासोबत 190 चेंडूत 290 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 400पार घेऊन गेला. या सामन्याप्रमाणेच विराटकडून चाहत्यांना कसोटी सामन्यात देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अवघी एक धाव करून विकेट गमावली आणि चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. विरानटे पाच चेंडू खेळले आणि तैजुल इस्लाम (Taijul Islam) याच्या चेंडूवर पायचीत पकडला गेला.
तैजूल इस्लामने या सामन्यात कसलेली गोलंदाजी केली आणि बांगालदेशसाठी वरच्या फळीतील दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला पहिला झटका बसला, तो शुबमन गिल (Shubman Gill) याच्या रूपात. गिलने 14 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. या षटकात तैजुल इस्लाम गोलंदाजी करत होता आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने यासीर अलीच्या हातात झेल दिला. गिलने 40 चेंडीत 20 धावा केल्या आणि विकेट गमावली. दुसरी विकेट कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने गमावली. खालीद अहमदने राहुलला अवघ्या 22 धावांवर तंबूत पाठवले. विराट कोहली याच्या रूपात संघाला तिसरा झटका बसला.
तैजुलचा चेंडू बनला चर्चेचा विषय –
तैजुनने टाकेलल्या चेंडूवर विराट कोहली पायचीत झाला. हा चेंडू सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः विराट देखील बाद झाल्यानंतर आश्चर्यचकीत झाल्यासारखाच दिसत होता. चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर स्पीन होत थेड विराटच्या पॅडला जाऊन लागला. चेंडून असा अचानकपणे पायात वळेल, याचा विराटला देखील अंदाजा नव्हता.
https://twitter.com/nikesh_gohite/status/1602892399012741120?s=20&t=tFFEr9GtFbmNwuX1R4UMag
चेंडू पायाला लागल्यानंतर पंचांनी विराटला बाद घोषित केले. मात्र, विराटला पंचांच्या निर्णयावर शंका असल्यामुळे त्याने चेतेश्वर पुजारासोबत चर्चा केली आणि रिव्यू घेतला. रिव्यूमध्ये चेंडू स्टंपच्या बाहेर जात असेल, असे विराटला वाटत असले, तरी तसे काही होताना दिसले नाही. चेंडू स्टंप्समध्येच जाणार होता आणि रिव्यूमध्येही पंचांचा निर्णय अचूक असल्याचे पाहायला मिळाले. परिणामी भारतीय संघाची धावसंख्या 48 असताना संघाला तिसरी विकेट गमवावी लागली. पुढे संघाने चौथी विकेट रिषभ पंतच्या रूपात 112 धावांवर गमावली. (In the first Test against Bangladesh, Virat scored just one run and lost his wicket)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?
अवघ्या 15 वर्षांचं पोरगं गाजवणार आयपीएल लिलाव! अश्विनला मानतो आदर्श