भारत आणि बागंलादेश या संघांमध्ये पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व केएल राहुल हा करतोय. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे सोपवण्यात आली. केएल राहुल याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसोबत मैदानात उतरला आहे. बांगलादेश संघ देखील 3 फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसमवेत मैदानात उतरला आहे. भाारत आणि बांगलादेश या संघांमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळवले गेले आहेत, त्यापैकी 9 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.
आतापर्यंत बांगलादेश संघ भारताला एकदाही कसोटी सामन्यात हरवू शकल नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलने केले होते भारताचेे नेतृत्व
जर केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे कसोटी सामन्यांचा जास्त अनुभव नाहीये. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच वर्षी जोहांसबर्ग कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण केेले होते. मात्र, भारताला त्या सामन्यात 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी होती आणि त्याने नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय घेतली होता. भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत पहिल्याा डावात 202 धावांवर गारद झालेला. दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या होत्या आणि सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 240 धावांचे लक्ष्य दिलेे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीता निर्णय घेतला. पहिल्या सत्रात भारताने 3 गडी गमावत 89 धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी केली. राहुल 54 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला त्यानंतर शुबमन 40 चेंडूत 20 धावा करत बाद झाला. त्यानंतर फंलदाजीसाठी आलेला विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीमध्ये झळकतोय संजू सॅमसन, झारखंड विरुद्ध पाडला षटकारांचा पाऊस
अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कारचा भीषण अपघात! हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल