भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेमध्ये आपल्या फलंदाजीचा जोर दाखवण्यासाठी तयार आहे. कसोटी सामन्यात त्याने आपले शेवटचे शतक 2019मध्ये झळकावले होते. विराटने नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतकीय डाव खेळला होता. आता कसोटी मालिका सुरु होण्याआधीच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार केएल राहुल याने विराटची प्रशंसा केली आहे.
केएल राहुल (KL Rahul) सामन्याच्या आधी म्हणाला आहे की, “आम्ही यावर्षी जास्त कसोटी सामने खेळले नाही. विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने टी20मध्ये देखील चांगले प्रदर्शन केले होते. नुकतच त्याने बांगलादेश विरुद्ध शतकही झळकावले. त्यामुळे त्याला कसोटी सामन्यातही आत्मविश्वास मिळेल.” राहुल पुढे म्हणाला की तो खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याला कोणत्या परिस्थितीत काय करावे हे चांगले माहिती आहे. त्याची मानसिकता आणि दृष्टीकोन नेहमी सारखा असतो. क्रिकेटसाछी त्याच्यामध्ये खूप तळमळ आहे. तो ज्या पद्धतीने संघला पुढे घेऊन जातो, ते पाहण्यासारखे आहे. तो एक महान खेळाडू आहे. तो प्रत्येक वेळी धावा करण्याच्या नव्या पद्धती शोधत असतो. मला अपेक्षा आहे की तो हे पुन्हा करण्यात यशस्वी होईल.
दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितच्या पुनरागमनाची शक्यता
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळण्याच्या बाबतीत राहुल म्हणाला की रोहित आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो खूप अनुभवी आहे आणि तो आमचा कर्णधारही आहे. जेव्हा संघाचा कर्णधार दुखापतग्रस्त होतो, तेव्हा पूर्ण संघाला त्याची कमतरता भासते. आम्हाला अपेक्षा आहे की तो दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करु शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशियाई चॅम्पियन जपान भारताकडून पराभूत, सलग दुसऱ्या विजयासह अंतिम चारमध्ये मिळवले स्थान
भारतासाठी 2018 मध्ये पदार्पण करणारा ‘हा’ गोलंदाज रुग्णालयात दाखल! जाणून घ्या कारकीर्द