भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यातील दुसरा कसोटी मंगळवारी मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर 8 गडी राखून मात केली. त्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी इंग्लंडचे माजी खेळाडू मायकेल वॉन यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एॅडलेड येथे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा निराशाजनक पराभव झाला होता. हा सामना गुलाबी चेंडूने खेळण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघ 36 धावांवर गुंडाळला होता. त्यामुळे इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी भविष्यवाणी केली होती की, या मालिकेत भारतीय संघाचा ४-० असा पराभव होईल. त्यामुळे भारतीय संघाचे चाहते त्यांच्या या वक्तव्याने नाराज झाले होते.
Told ya … India are going to get hammered in the Test Series … #AUSvIND #4-0
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 19, 2020
मात्र भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जोरदार पुनरागमन केले आणि दुसर्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांची भविष्यवाणी खोटी ठरली. यामुळे त्यांना भारतीय संघाच्या चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसेच सोशल मीडियावर मायकेल वॉन यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
@MClarke23 @MichaelVaughan #Rickypointing #markwaugh @cricketcomau all Prediction ???????????????? now we gonna a celebrate for a year #AUSvsIND pic.twitter.com/wazPK37NpL
— Ram☀️ (@DRRAMAN07) December 29, 2020
चाहत्यांनी मायकेल वॉन यांना केले ट्रोल
भारतीय संघाने मंगळवारी दुसरा कसोटी सामना जिंकताच मायकेल वॉन यांनी केलेल्या ट्विटचा चाहत्यांनी खरपूस समाचार घेतला. त्याचबरोबर मायकेल वॉनचे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. तसेच भारतीय संघाच्या चाहत्यांनी तयार केलेले मीम्स सुद्धा व्हायरल होत आहे. या मीम्सच्या माध्यमातून चाहते मायकेल वॉन यांच्यावर टीका करत आहेत.
#Michaelvaughan after seeing #INDvsAUS match result.@MichaelVaughan aur bhai, aa gaya swaad pic.twitter.com/z7u0PjX6qQ
— Shivam????️ (@Bae_caar) December 29, 2020
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद 195 धावसंख्या होती. त्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. त्यांनतर ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात सर्वबाद 200 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य दिले होते. ते भारतीय संघाने आपल्या दुसर्या डावात 2 गडी गमावून पूर्ण केले. त्यासह या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितच्या पुनरागमनाबद्दल अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा