---Advertisement---

सुसाट चाललेल्या इंग्लंडला टीम इंडियाने दाखवला लाल दिवा, भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य

---Advertisement---

नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 248 धावा केल्या आहेत. ज्यात जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. पण इंग्लंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आता भारताला जिंकण्यासाठी 249 धावा कराव्या लागतील. या सामन्यात टीम इंडियाचे सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा होते. दोघांनीही 3 इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लिश संघाकडून फिल सॉल्टनेही 43 धावांची जलद खेळी केली.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय चांगलाच यशस्वी झाला कारण फिल साॅल्ट आणि बेन डकेट यांनी संघाला फक्त आठ षटकांत 70 धावांचा पल्ला गाठून दिला. पण 9व्या षटकात फिल साॅल्ट धावबाद होताच सामना भारताच्या बाजूने वळला. फिल साॅल्ट, बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांनी अवघ्या 2 धावांच्या आत आपले विकेट गमावले.

एकेकाळी इंग्लंडने 77 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत, कर्णधार जोस बटलरने एक टोक सांभाळली. त्याने 67 चेंडूत 52 धावा केल्या पण अक्षर पटेलच्या चेंडूवर तो फसला आणि हार्दिक पांड्याकडे झेलबाद झाला. जोस बटलर आणि जेकब बेथेल यांच्यातील 59 धावांच्या जोरावर संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आले. बेथेलने 64 चेंडूत 51 धावा केल्या. बेथेलचा हा भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना होता.

भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

हेही वाचा-

IND vs ENG: टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचे सामन्यात पदार्पण, विराट कोहली बाहेर
अत्यंत वेदनादायी…द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन, क्रिकेटविश्वातील शब्दसूर्य मावळला..!
‘हे’ दिग्गज खेळाडू असणार मुंबईचा भाग, रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाविरुद्ध उतरणार मैदानात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---