पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा यांना भारतासह चार देशांत टी२० मालिका खेळायची आहे. त्यांनी सांगितले आहे की, याबाबत ते बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसोबत चर्चा करणार आहेत. रमीज राजा यांच्यामते भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार संघात ही चौरंगी मालिका व्हावी.
पण, जर भारत या मालिकेत सहभागी झाला नाही, तरी पाकिस्तान या मालिकेचे आयोजन करणार असल्याचे कराचीमध्ये पत्रकार परिषदेत रमिज राजा (Ramiz Raja) यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, “जर भारत वर्षात एकदा होणाऱ्या चार देशांच्या टी२० मालिकेच्या आयोजनासाठी तयार झाला नाही, तर आम्ही तीन देशांच्या टी२० मालिकेचे आयोजन करू. यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान हे संघ खेळताना दिसतील.”
रमीज राजाने विश्वास दाखवत सांगितले की, २०२३ च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार होईल. ते म्हणाले, “माझा विश्वास की, भारत पाकिस्तान दौरा करेल. परंतु, जर त्यांनी दौरा केला नाही, तर आम्हाला पाहावे लागले की याबाबत काय केले जाईल.”
आता सौरव गांगुली चार देशांच्या या टी२० मालिकेसाठी तयार होतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. सध्या हे दोन संघ आयसीसी सामन्यांव्यतिरीक्त फक्त आशिया कपमध्ये खेळताना दिसत असतात. पाकिस्तानने भारताला २०२१ च्या टी२० विश्वचषकादरम्यान इतिहासात पहिल्यांदाच पराभूत केले होते. पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला होता. यावर्षीच्या टी२० विश्वचषकात हे दोन संघ पुन्हा आमने सामने येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कब खून खोलेगा रे तेरा’, बाबर आझमने २ वर्षांनंतर शतक केल्याने विराट कोहली होतोय ट्रोल
गुजरात टायटन्ससाठी खूशखबर! कॅप्टन हार्दिकला आयपीएल खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल
अस्सल मुंबईकर ‘तात्या’ आले! पोलार्डच्या आगमनाचा खास व्हिडिओ पाहाच