भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी नुकतीच पार पडली. या कसोटीत अनेक विक्रम पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) ही १०० वी कसोटी होती तर भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने (Ravichandran Ashwin) या कसोटीत ४३५ विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेण्याचा कपिल देव यांचा (Kapil Deo) विक्रम मोडला आहे. यानंतर अश्विनने यावर आपले मत मांडले आहे.
अश्विन म्हणाला, त्याला कारकिर्दीची सुरुवात करताना तो कपिल देव यांचा विक्रम मोडेल असे त्याला कधीच वाटले नव्हते, असे त्याने म्हटले आहे. आपल्या ८५ व्या कसोटीत अश्विनने श्रीलंकाच्या दूसऱ्या डावात चरिथ असलंकाची विकेट घेतली आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४३५ विकेट पुर्ण केल्या. भारताच्या कसोटी इतिहासात अनिल कुंबळेने सर्वाधिक म्हणजेच ६१९ विकेट घेतल्या आहेत आणि आता अश्विन ४३५ विकेट घेत दूसऱ्या स्थानी आहे.
भारताने हा सामना २२२ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने पहिल्यांदा खेळत ५७४ धावांवर डाव घोषित केला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक १७५ धावा केल्या. दूसऱ्या डावात आर अश्विनने ४ आणि जडेजाने ४ विकेट घेतल्या.
अश्विनने भारताच्या विजयानंतर इंस्टाग्रामवर लिहले की, “२८ वर्षांपूर्वी मी महान क्रिकेटर कपिल देव यांच्या विकेट्सच्या विश्वविक्रमाचा आनंद घेत होतो. मला थोडा पण अंदाज नव्हता की मी एक फिरकी गोलंदाज बनेन आणि देशासाठी खेळेन. महान क्रिकेटर कपिल देव यांच्या विकेट्सचा विक्रम मोडेल. मी खूप आनंदी आहे आणि या खेळाने मला आत्तापर्यंत खूप काही दिले आहे, त्यामुळे मी आभारी आहे.”
पुढे अश्विनने लिहले की, “खेळपट्टी खरंच चांगली होती. फलंदाज जेव्हा खेळत होते, तेव्हा त्यांना बाद करणे सोपे नव्हते. श्रीलंकेच्या गोलंदाजांना खूप वेळ गोलंदाजी करावी लागली.” आर अश्विनने रविंद्र जडेजाच्या कसोटीत शानदार कामगिरीचे कौतुक केले आहे, तो म्हणाला, “मला वाटते की तो मागील ५-६ वर्षांमध्ये खूप पुढे गेला आहे. माझ्या मते तो ज्या क्रमांकावर सध्या फलंदाजी करत आहे तो क्रमांक खूप खाली आहे. त्याला माहितेय की तो काय करत आहे आणि त्याच्या फलंदाजीत तो झळकतो.”
अश्विनने आत्तापर्यंत ८५ कसोटी सामने खेळले असून ४३६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मोहम्मद अझरुद्दीन मुलाचा षटकार पाहून खूश! फ्रेंडशीप कपमध्ये बाप-लेकाच्या जोडीचा धुमाकूळ
नेतृत्त्वात हिट, तर फलंदाजीत फ्लॉप; स्वत:च्या सरासरी प्रदर्शनावर पृथ्वी शॉ म्हणाला, ‘हे ठीक आहे…’
मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण