बंगळूरु। आज(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेलानाही. त्यामुळे 18 सप्टेंबरला दुसऱ्या टी20 सामन्यात खेळवलेला 11 जणांचा संघच या सामन्यातही खेळणार आहे.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या 11 जणांच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. त्यांनी एन्रीच नोर्जेच्या ऐवजी रिझा हेंड्रिक्सचा 11 जणांच्या संघात समावेश केला आहे.
3 सामन्यांच्या टी20 मालिकेत सध्या भारतीय संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर दक्षिण आफ्रिका या मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका – रीझा हेंड्रिक्स, क्विंटॉन डी कॉक (यष्टीरक्षक/कर्णधार), तेंबा बावुमा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रेटोरियस, अॅन्डिले फेहलुक्वायो, बीजॉर्न फॉर्च्यून, कागिसो रबाडा, ब्युरान हेंड्रिक्स, तबराइज शम्सी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या रिषभ पंतला या माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला धोनीच्या टी२०मधील सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी