भारताचा ऑस्ट्रेलिया दौर्यावर वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर अनेक माजी खेळाडू या पराभवाचं विश्लेषण करत आहेत. अनेक खेळाडूंनी आणि तज्ज्ञांनी भारतीय गोलंदाजी या पराभवाला कारणीभूत आहे, असे म्हटले आहे. त्यातच भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय दहियाने देखील भारतीय संघाची समस्या सांगितली आहे. भारतीय संघातील कुठलाच फलंदाज कामचलाऊ गोलंदाजी करू शकत नसल्याने संघाचा समतोल साधला जात नाही आहे, असे मत विजय दहियाने मांडले.
कोचिंग स्टाफला धरले जबाबदार
माध्यमातील वृत्तानुसार विजय दहियाने कोचिंग स्टाफच्या भल्यामोठ्या संख्येमुळे कामचलाऊ गोलंदाज तयार होत नसल्याचे म्हटले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणारे दहिया म्हणाले, “आजकाल संघासह प्रत्येक क्षेत्राचे विशेषज्ञ प्रशिक्षक आणि शिवाय ३ ते ४ थ्रो-डाउन विशेषज्ञ असल्याने खेळाडूंना फलंदाजी व्यतिरिक्त कामचलाऊ गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. याच कारणाने सध्याच्या संघातील फलंदाजांपैकी कोणीही सामन्यात ३-४ षटकांसाठी गोलंदाजी करू शकत नाही.”
या समस्येमुळे संघाचा समतोल बिघडत असल्याकडेही विजय दहिया यांनी लक्ष वेधले. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे सध्या गोलंदाजी करत नसल्याने भारतीय संघाला केवळ पाच गोलंदाजीचे पर्याय सामन्यात उपलब्ध होतात. ही कामचलाऊ गोलंदाज उपलब्ध होत नसल्याची समस्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही जाणवत असल्याची पुस्ती दहिया यांनी जोडली.
एकेकाळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, सुरेश रैना असे अनेक कामचलाऊ गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असायचे. मोक्याच्या क्षणी त्यांनी टाकलेली ५-६ षटके संघासाठी निर्णायक असायची. परंतु सध्याच्या संघात असे पर्याय उपलब्ध नसल्याने ही समस्या संघ व्यवस्थापनासाठी एक डोकेदुखी ठरते आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज