भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. त्यामुळे निकाल बरोबरीत आला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही निराश दिसला. भारतीय कर्णधार म्हणाला की शेवटी थोडी निराशा झाली, 14 चेंडूत 1 धाव बाकी होती.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “ही धावसंख्या चेस करण्यासारखी होती. आणि ही धावसंख्या मिळविण्यासाठी आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार होती. आम्ही एक एक टप्या मध्ये चांगली फलंदाजी केली. पण संपूर्ण सामन्यात आम्ही सातत्य राखू शकलो नाही. आमच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. आम्ही चांगली सुरुवात केली पण आम्हाला माहित होते की 10 षटकांनंतर खरा खेळ सुरू होईल जेव्हा फिरकीपटू गोलंदाजी करतील. पण नंतर आम्ही काही विकेट गमावल्या आणि खेळात मागे पडलो.
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या भागीदारीमुळे आम्ही पुन्हा एकदा खेळात परतलो. शेवटी थोडे आमच्याकडून निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. अशा गोष्टी घडतात. श्रीलंकेने चांगला खेळ केला. पहिल्या डावात जशी खेळपट्टी होती तशीच राहिली आणि यजमानांसाठी खेळ थोडा सोपा झाला.
तो पुढे म्हणाला, “ही खेळपट्टी अशी नव्हती जिथे तुम्ही येऊन तुमचे शॉट्स खेळू शकता आणि धावा काढू शकता. धावा काढण्यासाठी तुम्हाला स्वतःला मैदानावर वेळ घालवावे लागेल आणि खरोखर चांगले प्रयत्न करावे लागतील. आम्ही ज्या प्रकारे शेवटपर्यंत लढलो याचा अभिमान आहे. सामना पुढे गेला. दोन्ही संघांनी संयम राखणे आणि खेळात टिकून राहणे महत्त्वाचे होते.
हेही वाचा-
“एक एकेला टीम इंडिया पर भारी”, श्रीलंकेच्या 21 वर्षाच्या गोलंदाजासमोर भारतीय संघ ढेर!
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
जिंकता-जिंकता गंडली टीम इंडिया, असलंकानं 2 चेंडूत केला गेम; भारत-श्रीलंका सामन्याचा अनपेक्षित निकाल