इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यात चांगलीच कमाल केली. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाला १५१ धावांनी परास्त केले. त्यामुळे भारतीय सध्या ०-१ ने आघाडीवर आहे. तसेच भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत अशा दोन्ही विभागांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. विशेष म्हणजे भारतीय संघाची कमजोर कडी समजल्या जाणाऱ्या वेगवान गोलंदाज विभागाने गेल्या काही काळापासून भारतीय संघात कमालीचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज सध्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
यातच आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने देखील भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागाचे कौतुक केले आहे. खास करून मोहम्मद शमीचे. आगरकरच्या मते विराट कोहली भारतीय संघाचा अत्यंत भाग्यशाली कर्णधार आहे. ज्याकडे उत्कृष्ट दर्जाचे वेगवान गोलंदाज आहे.
याबाबत सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसोबत बोलताना आगरकर म्हणाला, “शमी सपाट पीचवर देखील चांगली गोलंदाजी करून विकेट घेऊ शकतो. सध्याचा भारतीय वेगवान गोलंदाज विभाग अप्रतिम आहे. शार्दुल ठाकूरने पहिल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. त्याऐवजी इशांतला संघात स्थान मिळाले.”
“तसेच त्यानेदेखील चांगली गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. सध्याच्या भारतीय गोलंदाजांची खासियत ही आहे की, त्यांच्याकडे गोलंदाजीसाठीचे भरपूर प्रकार आहेत. जसप्रीत बुमराहची आपली एक वेगळी ॲक्शन आहे. तर मोहम्मद सिराज पूर्ण दिवस मैदानावर टिकून खेळू शकतो. त्याच्याकडे कसोटी सामन्यासाठी लागणारे कौशल्य देखील आहे. तर ईशांत शर्मा त्याच्या उंचीचा फायदा घेतो.” असेही आगरकर म्हणाला.
तसेच, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातील अंतिम ११ विषयी विचारले असता आगरकर म्हणाला, “माझ्यामते जोपर्यंत मैदानातील परिस्थितीत अचानक कोणताही बदल होत नाही. तोपर्यंत अंतिम ११ मध्ये बदल करणे, मला तरी गरजेचे वाटत नाही आणि तेही अशा संघांमध्ये ज्यांच्याकडून तुम्ही आधीचा सामना जिंकलेला असतो. मात्र, जर बदल झालाच तर आर अश्विनला संघात संधी मिळू शकते. सध्या असलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे बदल होण्याची शक्यता फारच कमी.”
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्समधील हेडींग्लेच्या मैदानावर होणार आहे. भारतीय संघ लीड्सला पोहोचला आहे. तसेच भारतीय संघाने तिथे सरावाला देखील सुरुवात केली आहे. यादरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात बदल झालेले दिसून येऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या –
–“ॲलिस्टर कूक अजूनही सलामीसाठी योग्य पर्याय”, दिग्गज इंग्लिश फलंदाजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर
–‘त्या’ कृत्यासाठी अनेक वर्षानंतर मार्क बाऊचरला मागावी लागली माफी
–वरूण चक्रवर्तीचा खुलासा, ‘या’ कारणामुळे आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी दिनेश कार्तिककडून घेतला होता सल्ला