भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने ८ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी देखील त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या टी-२० सामन्यात ८ धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. परंतु आयसीसीने ठरवून दिलेल्या वेळेत डाव न संपल्याने भारतीय संघावर सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावला आहे.(Indian women’s team fined for slow over rate against England women in 2nd t20 match)
या सामन्यातील सामना अधिकाऱ्याने भारतीय संघावर दंड आकारला आहे. कारण भारतीय संघाने ठरवलेल्या वेळात २० षटके गोलंदाजी केली नाही. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडूंना एक षटक कमी गतीने टाकल्यामुळे सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.”
तसेच भारतीय टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सामना अधिकाऱ्यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे आयसीसीने २० टक्के दंड आकारला आहे आणि आरोप मान्य केल्यामुळे याबाबत अधिकृत सुनावणी केली जाणार नाही. भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी -२० सामना येत्या १४ जुलै रोजी खेळला जाणार आहे.
भारतीय संघाने केल्या होत्या १४८ धावा
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाकडून शेफाली वर्माने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली होती. यादरम्यान तिने ८ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३१ धावांची खेळी केली होती. २० षटकअखेर भारतीय महिला संघाला ४ गडी बाद १४८ धावा करण्यात यश आले होते.
भारतीय संघाने ८ धावांनी मिळवला विजय
भारतीय संघाने दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड महिला संघाकडून सलामी फलंदाज तामसिन ब्यूमॉन्टने ५९ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार लगावले होते. तसेच कर्णधार हिथर नाईटने ३० धावांचे योगदान दिले होते. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे इंग्लंड संघाला २० षटकअखेर ८ बाद १४० धावा करण्यात यश आले. हा सामना भारतीय महिला संघाने ८ धावांनी जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत आणली.
महत्वाच्या बातम्या –
वनडे क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ७ संघांच्या ‘या’ आहे कर्णधार-उपकर्णधारांच्या जोड्या
‘आपण २०३० विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का?’ केविन पीटरसनचा संतप्त सवाल
युरो कपनंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटूंना आली २०१९ विश्वचषकाची आठवण, इंग्लंड संघाला केले ट्रोल