भारतीय संघ आशिया चषक 2023 च्या तयारीला लागला आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया संघासोबत भारत वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषक 2023 स्पर्धा आयोजित केली जाईल, अशा परिस्थितीत येणारा काळ भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनेही पुरुष संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ती म्हणते की, “भारतीय संघाला यावेळी विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे आणि आमचा संघ प्रबळ दावेदार आहे.”
एका कार्यक्रमा दरम्यान भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) म्हणाली की, “एक भारतीय क्रीडाप्रेमी असल्याने भारतीय संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना खेळावा अशी माझी इच्छा आहे. कारण आम्हाला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे. भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून येथील परिस्थितीही आमच्यासाठी अनुकूल आहे, त्यामुळे संघाने चांगली कामगिरी करावी आणि विश्वचषक जिंकण्यात यश मिळवावे.”
माजी कर्णधार पुढे म्हणाली की, “आता भारतात महिला क्रिकेट वेगाने प्रगती करत आहे. यंदाच्या महिला आयपीयलने ही उत्साहात भर घातली आहे. येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटचा वेग अधिक वाढेल, अशी आम्हाला आशा आहे. असे ती यावेळी म्हणाली
मितालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत
भारतीय महिला संघाच्या महान दिग्गज कर्णधाराने आपल्या कारकीर्दीत भारतीय संघासाठी 232 वनडे सामने खेळत 7805 धावा केल्या आहेत. यात 7 शतके आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. सोबतच 89 टी20 सामन्यात तिने 2364 धावा करत 17 अर्धशतके ठोकली आहेत. मितालीने केवळ 12 कसोटी सामने खेळत 699 धावा केल्या आहेत. यात 1 अर्धशक आणि 4 अर्धशतके आहेत. तिला महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. (indian wome’s cricket team captain told india is strong contender to wining world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023 साठी जसप्रीत बुमराह तयार, नव्या हेअरस्टाईलची सर्वत्र चर्चा
पाकिस्तानची वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी, अशिया चषकापूर्वीच लॉन्च केली नवीन जर्सी