आयपीएल 2025 मधील नवव्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सचा फिरकीपटू साई किशोर यांच्यातील चकमक चर्चेचा विषय ठरला. सामन्यादरम्यान 15व्या षटकात दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र पंचांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनाक्रमानुसार, गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईवर दबाव वाढवत असताना साई किशोरने हार्दिक पांड्याला एक अचूक चेंडू टाकला. हार्दिकने तो चेंडू फक्त रोखला, त्यानंतर साई किशोरने त्याच्याकडे पाहत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. यावर हार्दिकनेही काही शब्द बोलले, ज्यावर किशोरने प्रत्युत्तर दिले. वाद चिघळण्याच्या शक्यतेमुळे पंचांनी दोघांनाही वेगळे केले.
GAME ????
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
Hardik Pandya ⚔ Sai Kishore – teammates then, rivals now! ????????
Watch the LIVE action ➡ https://t.co/VU1zRx9cWp #IPLonJioStar ???? #GTvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar pic.twitter.com/2p1SMHQdqc
तथापि, सामना संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि सगळा वाद संपल्याचे स्पष्ट केले. साई किशोरने नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की हार्दिक त्याचा चांगला मित्र आहे आणि दोघेही केवळ खेळात आक्रमकता दाखवत होते.
All’s well that ends well! ????????#IPLonJioStar ???? #DCvSRH | SUN, 30 MAR, 2:30 PM | LIVE on Star Sports 2, Star Sports 2 Hindi & JioHotstar! | #IndianPossibleLeague pic.twitter.com/i4E2Rcf3VI
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
या विजयासह गुजरात टायटन्सने हंगामातील पहिल्या विजयाचा नोंद केला आहे, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा दुसरा पराभव ठरला, पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने एमआयला हरवले होते.






