आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आजपर्यंत ४ तर चेन्नईने ३ विजेतेपद मिळवली आहे. १२ पर्वातील तब्बल ७ पर्वात या दोन संघांची मक्तेदारी राहिली आहे. या ४ पैकी ३ विजेतेपद मिळवताना मुंबईने चेन्नईला पराभूत केले असून एकदा धोनी कर्णधार असलेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट्सला धुळ चारली आहे.
आयपीएल इतिहासात चार वेळा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात अंतिम सामना झाला आहे. २०१०, २०१३, २०१५ आणि २०१९च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात आमने सामने आले होते. यामध्ये मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये तर चेन्नईने २०१०ला बाजी मारली होती.
तसेच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामना गाठणाऱ्या संघांमध्येही चेन्नई आणि मुंबई अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर आहेत. आज चेन्नई आयपीएलचा८ वेळा तर मुंबई ५ वेळा अंतिम सामना खेळला आहे.
अंतिम सामन्यात चेन्नई ५वेळा तर मुंबई केवळ एकदा पराभूत झाली आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध धोनी –
मुंबई इंडियन्स आणि धोनीबाबत आयपीएलमधील खास गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाकडून धोनी खेळला आहे.
धोनी चेन्नईचा कर्णधार असल्याने तो २०१०, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये चेन्नईकडून मुंबई विरुद्ध आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला. तर २०१७च्या मोसमात अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघात पार पडला. यावेळी धोनी पुण्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करत होता.
आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झालेले आयपीएलचे अंतिम सामने-
2010 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – चेन्नई सुपर किंग्स)
2013 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (विजेता – मुंबई इंडियन्स)
2015 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – मुंबई इंडियन्स)
2019 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – मुंबई इंडियन्स)
ट्रेंडिंग घडामोडी-
-वाढदिवसालाच क्रिकेटमध्ये वाढीव कारनामा करणारे ५ खेळाडू
-आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा मान या क्रिकेटपटूच्या नावावर
-अबब! पुढील ४ वर्षात होणार क्रिकेटचे ५ वर्ल्डकप!