---Advertisement---

भारतीय संघात पुनरागमन करताच संजू सॅमसनच्या नावावर झाला हा नकोसा विक्रम

---Advertisement---

पुणे। आज(10 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे सुरु आहे. या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. हा त्याचा दुसराच आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे.

याआधी तो भारताकडून 19 वर्षांचा असताना 19 जुलै 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध एकमेव टी20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तब्बल 5 वर्षे लागली आहेत.

या कालावधीत भारताने तब्बल 73 टी20 सामने खेळले आहेत. त्यामुळे तो भारताकडून  आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामन्यानंतर पुनरागमन करणारा खेळाडू ठरला आहे.

याआधी हा नकोसा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळल्यानंतर दुसरा टी20 सामना 2018 मध्ये खेळला होता. यादरम्यान भारताने 65 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले होते.

तसेच जागतिक विक्रमाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामन्यानंतर पुनरागमन करण्याचा विक्रम जो डेन्लीच्या नावावर आहे. तो 2010 ते 2018 दरम्यान इंग्लंडने खेळलेल्या तब्बल 79 टी20 सामन्यांत खेळला नव्हता.

एका संघाकडून दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्यादरम्यान मुकावे लागलेले सर्वाधिक सामने –

79 सामने  – जो डेन्ली (2010-2018)

74 सामने – लियाम प्लंकेट (2006-2015)

73 सामने – माहेला उदावट्टे (2009 -2017)

73 सामने – संजू सॅमसन (2015-2020)

72 सामने – फर्विझ महारुफ (2008 -2016)

66 सामने – सोहेल खान (2011-2017)

65 सामने – उमेश यादव (2012 -2018)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---