चेन्नई। मंगळवारी(१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरावर १० धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने एक खास ट्विट केले, ज्यावर चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबई इंडियन्सच्या ट्विटने जिंकली चाहत्यांची मने
मुंबईने सामना जिंकल्यानंतर ‘ह्याला म्हणतात नवीन वर्षाची गोड सुरुवात’, असे मराठीत ट्विट केले. या ट्विटने अनेक मराठी चाहत्यांची मने जिंकली आहेत. या ट्विटला अनेक रिट्विट तसेच प्रतिक्रियाही आल्या आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1382027866456559617
खरंतर मंगळवारी महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत मुंबई इंडियन्सने हे ट्विट केले होते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा संघ मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातून या संघाला मोठा पाठिंबाही मिळतो.
https://twitter.com/CammandoDhruv/status/1382028928454328322
https://twitter.com/SuyogD3479/status/1382028223781818370
https://twitter.com/MostlyMore/status/1382029954045595652
https://twitter.com/aaki_sky/status/1382028330011136001
https://twitter.com/RajeVijayMayek1/status/1382049257474064386
मुंबई इंडियन्सने जिंकला सामना
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या आणि कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तसेच कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसलने २ षटकांत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
यानंतर १५३ धावांच्या आव्हानाचा पाठालाग करण्यासाठी उतरलेल्या कोलाकाताकडून शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामीला ७२ धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र गिलला ९ व्या षटकात राहुल चाहरने बाद केले. याबरोबरच त्याने राहुल त्रिपाठी(५) आणि ओएन मॉर्गन(७) यांनाही स्वस्तात बाद केले. एवढेच नाही तर चाहरने त्याच्या वैयक्तिक शेवटच्या षटकात अर्धशतकी खेळी करणाऱ्या नितीश राणाला बाद करत आपली चौथी विकेट मिळवली. राणाने ४७ चेंडूत ५७ धावा केल्या.
राणा बाद झाल्यानंतर मात्र कोलकाताच्या फलंदाजांना अखेरच्या चार षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी फार काही करु दिले नाही. जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी अखेरच्या ४ षटकांत कोलकाताला ३० धावांची गरज असताना केवळ १९ धावाच करु दिल्या. त्यामुळे मुंबईला या सामन्यात विजय मिळवता आला.
महत्त्वाच्या बातम्या –
दे घुमा के! सुर्यकुमारचा ९९ मीटरला हेलिकॉप्टर षटकार पाहून हार्दिक पंड्याही झाला थक्क, पाहा व्हिडिओ
केवळ २ षटकांत ५ विकेट्स घेणाऱ्या रसेलचा मोठा कारनामा; रोहित, झहीरलाही टाकले मागे