अशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक दिसत आहेत. अशिया चषकाच्या 39 वर्षांच्या इतिहासात ही स्पर्धा पहिल्यांदाच हायब्रिड मॉडेलनूसार खेळवली जात आहे. या वर्षी अशिया चषकाचे यजमान पद पाकिस्तान सांभाळणार होते परंतु, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. या कारणाने ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात विभागली गेली. आता या स्पर्धेचे सुरवातीचे 4 सामने पाकिस्तानात खेळवले जातील तर, उर्वरीत 9 सामने श्रीलंकेत होणार आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने या हायब्रिड मॉडेलबाबत वक्तव्य केले आहे.
अशिया चषकात पाकिस्तान संघ नेपाळ विरुद्ध 30 ऑगस्टला समोर असणार आहे. यापूर्वी पत्रकार परिषेदेत बाबर आझम (Babar Azam) म्हणाला की, “जर तुम्ही मला विचाराल तर माझे म्हणने आहे की, चांगले झाले असते संपूर्ण आशिया चषक पाकिस्तानमध्ये झाला असता. मात्र, दुर्देवाने असे होवू शकणार नाही.
या स्पर्धेचे नियोजन आणि नियोजन व्यवस्थितरित्या केले असेल, परंतु दोन्ही देशांमधील वारंवार होणाऱ्या हालचालींचा फटका खेळाडूंना नक्कीच बसणार आहे. 30 ऑगस्टच्या सामन्यानंतर, पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला जायचे आहे जिथे त्यांचा सामना 2 सप्टेंबरला भारतीय संघा सोबत होईल. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबरला पाकिस्तान संघाला सुपर फोरचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात परतावे लागेल. बाबरला याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने सांगितले की “खेळाडू म्हणून, आम्हाला दिलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत.”
बाबर पुढे म्हणाला की, “आमच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने आम्ही प्रत्येक खेळाडूचा किती उपयोग करू याचे नियोजन केले आहे. तसेच, आमच्या प्रवासाच्या वेळापत्रकामुळे आम्हाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल अशा प्रकारे आम्ही आमच्या विमानचे बुकिंग केले आहे.”
दरम्यान पाकिस्तान संघ आशिया चषाकासोबत विश्वचषाकाच्या तयारीला देखिल लागलेला दिसून येत आहे. पाकिस्तान संघाने नुकतीच विश्वचषकासाठी आपली जर्सी देखिल प्रदर्शित केली आहे. (pakistan captain babar azam talk about hyebrid model asia cup 2023 )
महत्वाच्या बातम्या-
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानविरुद्ध विराटसाठी चालून आली मोठी संधी, लगेच वाचा
हुबळी टायगर्स महाराजा टी20 चॅम्पियन! कॅप्टन मनीष पांडेच्या क्षेत्ररक्षणाने पलटली बाजी