गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. प्रत्येक क्षेत्रात भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्यात सुधारणा करून भारतात नव्या क्रिकेटची सुरुवात केली. सध्याच्या भारतीय संघात खेळायचे असल्यास खेळाडूला पूर्णपणे तंदुरुस्त असणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.
त्यामुळे गेल्या काही काळापासून भारतीय संघाला अनेक असे उत्कृष्ट खेळाडू मिळाले, ज्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवून ना केवळ भारतातच तर जगभरात आपली ख्याती पसरवली. त्यातीलच एक नाव म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या.
हार्दिक भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. मात्र गेल्या काही काळापासून तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याचाच परिणाम त्याच्या खेळावर देखील झाला आहे. गेल्या काही काळापासून हार्दिक गोलंदाजी पासून दूर राहिला होता. तर फलंदाजीत देखील सध्या तो खरा फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंका दौऱ्यातही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.
त्यामुळे हार्दिक बाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. अशात हार्दिकच्या खेळण्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, श्रीलंका दौऱ्यात गोलंदाजी प्रशिक्षक राहिलेले पारस म्हांब्रे यांनी हार्दिक पंड्या विश्वचषक स्पर्धेचे पर्यंत गोलंदाजीसाठी तंदुरुस्त होईल, असा दावा केला आहे.
यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने हार्दिक पांड्याला एक सल्ला दिला आहे. यामध्ये त्याने हार्दिकसोबत येत असलेल्या अडचणीबाबत देखील चर्चा केली आहे. बटच्या मते हार्दिकची खरी अडचण ही त्याची शरीरयष्टी आहे. हार्दिक शरीराने खूपच बारीक आहे. त्यामुळे तो नेहमी दुखापतग्रस्त होतो. त्यामुळे त्याला यातून सावरायलाही वेळ लागतो. हार्दिकचे शरीर गोलंदाजी करण्यासाठी अजून परिपक्व नसल्याचे देखील बट म्हणाला.
याबाबत बोलताना बट म्हणाला, “हार्दिकने त्याच्यात तब्येतीत सुधार करावा. त्याने त्याची तब्येत मजबूत करावी. जर हार्दिकवर अतिरिक्त भार येत राहिला, तर तो नेहमी दुखापतग्रस्त होत राहील. त्यामुळे हार्दिकने लवकरात लवकर त्याची तब्येत सुधरवावी.”
कपिल देव आणि इम्रान खान यांचेही दिले उदाहरण
तसेच पुढे बोलताना तो म्हणाला, “हार्दिकमध्ये खूप क्षमता आहे. तसेच तो आणखीन यात वाढ करू शकतो. हार्दिकची गोलंदाजी करण्याची ॲक्शन देखील मस्त आहे. मात्र, त्याचे शरीर अतिरिक्त भार संभाळू शकत नाही, आणि याच गोष्टीवर हार्दिकला काम करणे गरजेचे आहे.”
तसेच बटने कपिल देव आणि इम्रान खान यांचे उदाहरण देत मजबूत शरीरयष्टीची आवश्यकता का आहे, हे देखील स्पष्ट केले. त्याच्या मते, कपिल देव आणि इम्रान खान दोघेही त्यांच्या काळात अत्यंत तंदुरुस्त खेळाडू होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न, दिग्गजांकडून गिरवतोय धडे, पाहा फोटो
–‘या’ बाबतीत संगकारा आहे धोनीपेक्षा सरस, आजच्या दिवशी केलेला क्रिकेटला अलविदा
–उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स