---Advertisement---

4 सामन्यात 26 धावा…, सूर्यकुमार यादवला झाले तरी काय? माजी क्रिकेटपटूने दिला मोलाचा सल्ला

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2025 1:04 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर असतील. या मालिकेत सूर्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत यावरून त्याच्या खराब फॉर्मचा अंदाज येतो. मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने 6.50 च्या सरासरीने फक्त 26 धावा केल्या आहेत. मात्र, आज तो त्याच्या घरच्या मैदानावर परतत आहे. ज्यात चाहत्यांना तो पुन्हा फॉर्ममध्ये येईल आणि मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असेल.

सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबद्दल हा माजी क्रिकेटपटूही चिंतेत आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना पियुष चावला म्हणाला, “आपल्या सर्वांना माहित आहे की वानखेडेवर धावा होतात, परंतु सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना देखील मदत मिळते. म्हणून जर तुम्ही पहिल्या पाच षटकांमध्ये चांगले खेळलात तर या ठिकाणी मोठ्या धावा होतात, 200 बद्दल माहित नाही, पण मला सूर्याला धावा करताना पहायचे आहे.”

सूर्याबद्दल बोलताना चावला म्हणाला, “तो संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. तो कर्णधार आहे. आम्ही त्याला इतके दिवस टी20 सामन्यांमध्ये शांत बसलेले पाहिले नाही. सध्या तो ज्या टप्प्यातून जात आहे, त्यात त्याला 30 किंवा 40 धावांची खेळी हवी आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “या धावांमुळे त्याचा आत्मविश्वासही वाढेल आणि ते संघासाठीही चांगले ठरेल. त्यामुळे 200 बद्दल कोणतीही माहिती नाही, पण मला सूर्याच्या बॅटमधून धावा पहायला आवडेल. दरम्यान, जर सूर्याच्या बॅटमधून धावा आल्या. 200 धावा होणे काही मोठी गोष्ट नाही.” 

भारताने ही मालिका आधीच 3-1 ने जिंकली आहे. मागील पुण्याच्या टी20 सामन्यात भारताने 15 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. एकेकाळी भारताच्या हातातून सुटलेला सामना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भारताच्या पारड्यात आणला आणि शानदार विजय मिळवला. त्यामुळे आजचा सामना केवळ औपचारिक आहे.

हेही वाचा-

U-19 Women’s WC; या वर्षीचा पहिला विश्वचषक आज येणार? जेतेपदसाठी भारत – दक्षिण आफ्रिका समोरासमोर
बीसीसीआय ‘नमन सोहळ्यात’ सरफराज खान चमकला, या मोठ्या पुरस्काराने सन्मानित!
विराट कोहली बीसीसीआयवर नाराज? वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---