भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. २०१८ साली त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. त्यांनतर त्याने पाच कसोटी सामने आणि तीन वनडे सामने भारताकडून खेळले. मात्र त्यांनतर विविध कारणांनी त्याला संघाबाहेर राहावे लागले. फिटनेसचा अभाव, डोपिंग प्रकरण, सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात आलेले अपयश यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला.
त्यामुळे भरपूर गुणवत्ता असून देखील पृथ्वी शॉ त्याला न्याय देण्यात अपयशी ठरला, असे म्हंटले जाते. गेल्या काही काळात आपला चांगला फॉर्म कायम राखण्यात त्याला यश आले नाही. त्याला भरपूर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले. या ट्रोलिंगला कसे सामोरे जायचे याबाबत पृथ्वीने नुकताच खुलासा केला.
‘असा’ करायचा ट्रोलिंगचा सामना
पृथ्वी शॉने पदार्पणात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करत कारकिर्दीची झोकात सुरुवात केली होती. मात्र त्यांनतर सततच्या दुखापतींमुळे संघाबाहेर झाला होता. त्यांनतर काही काळ उत्तेजक सेवनाच्या प्रकरणात अडकल्याने देखील काही काळ त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. तसेच संघात परतल्यावर देखील त्याला चांगली कामगिरी करून संघात स्थान टिकवण्यात अपयश आले. यांनतर वारंवार त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
याबाबत क्रिकबजशी बोलताना पृथ्वीने ट्रोलिंगला उत्तर देण्याचे मार्ग सांगितला. ‘चांगली फलंदाजी करा आणि भरपूर धावा करा’, हाच यावरचा एकमेव उपाय आहे, असे पृथ्वी म्हणाला. “मला देखील कधी कधी वाटते की सगळे काही बंद करून टाकावे. पण भारतासाठी खेळणे, हेच माझे स्वप्न होते. कधी कधी टीकेचा सामना करतांना ज्या गोष्टी खऱ्या नसतात, त्या देखील ऐकून घ्याव्या लागतात. त्यामुळे चांगली फलंदाजी करा, भरपूर धावा काढा आणि बस खुश राहा”, असा ट्रोलिंगचा सामना करण्याचा मार्ग पृथ्वीने यावेळी सांगितला.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम साऊदीने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी सुरू केला माईंड गेम; केले हे मोठे भाष्य
‘ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियासारखे का खेळले नाही?’, जाफरचा ‘त्या’ खेळाडूला खोचक प्रश्न
महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीचा वाद संपेना! आता गांगुलीने ‘या’ कारणाने व्यक्त केली नाराजी