येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतला विश्रांती देण्यात आली होती. आता या मालिकेतून तो जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते.(india tour of South Africa)
रिषभ पंत (rishabh pant) ज्यावेळी सेंच्युरियनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल. त्यावेळी त्याच्याकडे माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून ९७ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये ८९ झेल आणि ८ स्टंपिंगचा समावेश आहे. तो यष्टिरक्षक म्हणून १०० बळी घेण्यासाठी अवघे ३ पाऊल दूर आहे. जर त्याने येणाऱ्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला. तर असा कारनामा करणारा तो वेगवान यष्टिरक्षक ठरणार आहे. रिषभ पंतने आतापर्यंत २५ कसोटी सामने खेळले आहेत. (Most dismissal as wicketkeeper)
एमएस धोनीने ३६ कसोटी सामन्यात केला होता हा कारनामा
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने(ms dhoni) ३६ कसोटीत १०० बळी घेण्याचा कारनामा केला होता. जर रिषभ पंतला हा कारनामा करण्यात यश आले. तर तो एमएस धोनीच्या १० कसोटी सामन्यांपूर्वी असा कारनामा करणारा यष्टिरक्षक ठरेल. सर्वात कमी कसोटी सामन्यात १०० बळी घेण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावे आहे. त्यानंतर या यादीत वृद्धिमान साहाचा समावेश आहे. वृद्धिमान साहाने हा कारनामा ३७ कसोटी सामन्यात केला होता. तर किरण मोरेंनी हा कारनामा ३९ आणि नयन मोंगियाने ४१ कसोटी सामन्यात १०० बळी घेण्याचा विक्रम केला होता.
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड म्हणतेय, “जेव्हा वाटेल तेव्हा भारतात निघून जा…”; काय आहे कारण?
हे नक्की पाहा :