भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध (WIvsIND) पाच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. तर मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडा, अमेरिका येथे खेळला जाणार होता. मात्र व्हिसाच्या समस्यांमुळे हे सामने होणार की नाही याबाबत शंका होती. आता यावर उपाय निघाला असून ते सामने ठरल्याप्रमाणेच खेळले जाणार आहेत.
रोहित शर्मा आणि बाकी भारतीय खेळाडूंना फ्लोरिडा येथे होणाऱ्या सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. तर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन फ्लोरिडाला पोहोचला देखील आहे. तसेच ज्यांना व्हिसा मिळाला नाही ते गयानाला पोहोचले गेले होते. रोहित, प्रशिक्षक राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि बाकी खेळाडूंकडे अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा नव्हता. तर आता ही समस्या सुटली असून उर्वरित दोन्ही सामने फ्लोरिडामध्येच होणार हे निश्चित आहे. वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेला पोहोचला आहे. या मालिकेतील चौथा सामना ६ ऑगस्ट आणि पाचवा सामना ७ ऑगस्टला खेळला जाणार आहेत.
मुलाखतीनंतर मिळाला व्हिसा
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता. त्यांना मुलाखतीसाठी गयानाच्या अमेरिका दुतावासात पाठवण्यात आले. ही मुलाखत तिसऱ्या टी२० सामन्यानंतर झाली. यामध्ये रोहित आणि द्रविड यांचा समावेश होता. तसेच रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रवि बिश्नोई, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव अमेरिकेला पोहोचले आहेत. अश्विनने तर त्याच्या इंस्टाग्रामला स्टोरी देखील ठेवली आहे.
मालिका विजयावर लक्ष
भारत या टी२० मालिकेत २-१ असा पुढे आहे. यामुळे चौथा सामना जिंकत भारताचे मालिका विजयावर लक्ष असणार आहे. सध्याच्या भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे सामना जिंकत मालिकाही जिंकून देऊ शकतात. टी२० विश्वचषक आणि एशिया कपसाठीची तयारी म्हणून ही मालिका महत्वपूर्ण आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॉश एकेरीत भारताचे पहिले पदक! सौरव घोषालची ऐतिहासिक कामगिरी
सूर्याचा ‘तो’ षटकार पाहून कॉमेंटेटर्सही झाले शॉक, पुन: पुन्हा पाहावा असा आहे
रोहितनंतर सलामीवीर म्हणून टी२०त स्म्रीतीचाच बोलबाला, बनलीये पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर